विधानसभा

दुष्काळ निवारणासाठी २ हजार ६२५ कोटी

राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने २ हजार ६२५ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केलीय. विधानसभेत दुष्काळ स्थितीबाबत झालेल्या जोरदार चर्चेनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी ही घोषणा केलीय.

Jul 12, 2012, 09:30 AM IST

माथाडींच्या घराचा प्रश्न: विरोधकांचा गोंधळ

माथाडी कामगारांच्या घराच्या प्रश्नावरुन मंगळवारी विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. घराबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन द्यावं, अशी मागणी विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी केली. या प्रश्नावरुन विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

Jul 10, 2012, 01:50 PM IST

'कॅग'वरून विधानसभेत जोरदार राडा...

बहुचर्चित कॅगचा अहवाल थोड्याच वेळापूर्वी विधानसभेत मांडण्यात आला. मात्र सदस्यांना अहवालाच्या प्रती देण्यास सरकारनं टाळाटाळ केली आहे. त्यामुळे विधानसभेत गोंधळ झाला.

Apr 17, 2012, 03:06 PM IST

सेनेने मूर्ती आणायला नको होती- मनसे

शिवसेना-भाजप आमदारांनी विधानसभेत गणपतीच मूर्ती आणायला नको होती. असं वक्तव्य मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी केलीय. राज्य सरकारनं सत्तेचा दुरुपयोग केला असून निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले तर आम्ही त्यांना मदत करु असेही ते म्हणाले.

Mar 30, 2012, 08:37 PM IST

युतीचे १४ आमदार वर्षभरासाठी निलंबित

रागयड जिल्ह्यातील दिवेआगर गणेश चोरीचा तपास लागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या युतीच्या १४ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ तर भाजपचा १ आमदार एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

Mar 30, 2012, 02:32 PM IST

गॅस कर : मागे घेण्यासाठी विरोधकांचा दबाव

गॅस दरवाढीविरोधात शिवसेना आमदारांनी विधानसभेत घोषणाबाजी केली. गॅस दरवाढ कमी करण्याची मागणी केली. गॅस सिलिंडरवर पाच टक्के कर लावल्यानं सरकारला २००कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.

Mar 28, 2012, 03:44 PM IST

शिवाजी स्मारकावरून विधानसभेत गोंधळ

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकानी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातला. दरम्यान, समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाबाबत सरकार कटीबद्ध , असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोंधळ कमी करण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

Mar 15, 2012, 07:55 PM IST

सभागृहात केवळ आश्वासनांची खैरात

विधीमंडळाच्या सभागृहात आश्वासनांची खैरात वाटली जाते मात्र मंत्री त्या आश्वासनांची पूर्ताताच करत नाहीत विधीमंडळाच्या आश्वासन समितीनच हा खुलासा केला आहे.

Dec 21, 2011, 06:36 AM IST