'या' कारणामुळे कोहलीला देण्यात आली विश्रांती

जबरदस्त फॉर्ममध्ये असतानाही कॅप्टन विराट कोहली श्रीलंके विरूद्धच्या १० डिसेंबरच्या सामन्यात तो दिसणार नाही. कारण 

Updated: Nov 27, 2017, 08:50 PM IST
'या' कारणामुळे कोहलीला देण्यात आली विश्रांती  title=

मुंबई : जबरदस्त फॉर्ममध्ये असतानाही कॅप्टन विराट कोहली श्रीलंके विरूद्धच्या १० डिसेंबरच्या सामन्यात तो दिसणार नाही. कारण 

तीन मॅचच्या एक दिवशीय सिरीजमध्ये विराट कोहली खेळणार नसल्याचं सांगण्यात आलं. बीसीसीआयने याची माहिती दिली आहे. मात्र यानंतर अनेक तर्क वितर्क केले जात आहेत. उत्तम खेळत असतानाही विराट कोहलीला का आराम दिला जात आहे? याचा संबंध अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाशी जोडला जात आहे. असं सांगण्यात येत आहे की, विराट आणि अनुष्काच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. 

विराट कोहलीला 'या' साठी दिल्ली सुट्टी? 

गेल्या महिन्यात BCCI ला दिलेल्या एप्लीकेशनमध्ये सुट्टीचं कारण विराटने 'पर्सनल' असं म्हटलं आहे. तसेच अनुष्काच्या ही अगदी जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्का देखील डिसेंबरमध्ये कोणतंही काम करणार नाही आहे. 

वेबसाइट स्पॉटबॉयमध्ये दिलेल्या सूत्रांनुसार असा दावा करण्यात आला आहे की, कोहली दिल्लीच्या घरात आणि अनुष्का मुंबईच्या घरात लग्नाची तयारी करणार आहे. तसेच फॅशन डिझायनर सब्यसाची आपल्या टीमसोबत अनुष्काच्या घरी देखील गेली असल्याची माहिती मिळाली आहे. असं सांगण्यात येत आहे की, ती टीम अनुष्काच्या लग्नासाठी कपडे डिझाइन करत आहे. 

हल्लीच विराट आणि अनुष्काची एक जाहिरात लोकप्रिय होत आहे. ती जाहिरात लग्नाच्या गोष्टींशी जोडलेली आहे. ज्या जाहिरातीमध्ये दोघे एकमेकांसोबत ७ वचन घेत असल्याचं दिसत आहे. त्यावरूनही असे तर्क लावले जात आहेत की, हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.