चौथ्या दिवसअखेर भारताकडे 49 धावांची आघाडी

कोलकाता टेस्टच्या चौथ्या दिवसअखेर भारतानं ४९ रन्सची आघाडी घेतली आहे. अपु-या प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थोडा लवकर थांबवण्यात असून भारत 1 विकेट गमावत 171 रन्सवर खेळत होता. 

Updated: Nov 19, 2017, 06:51 PM IST
चौथ्या दिवसअखेर भारताकडे 49 धावांची आघाडी title=

कोलकाता : कोलकाता टेस्टच्या चौथ्या दिवसअखेर भारतानं ४९ रन्सची आघाडी घेतली आहे. अपु-या प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थोडा लवकर थांबवण्यात असून भारत 1 विकेट गमावत 171 रन्सवर खेळत होता. 

एल. राहुल 73 तर चेतेश्वर पुजारा 2 रन्सवर नॉट आऊट असून शिखर धवननं 94 रन्स केल्या. धवनला दासून शनाकानं आऊट खेलं. दरम्यान कालच्या 4 विकेट्स 165 रन्सच्या पुढे खेळताना लंकेनं  ऑल आऊट 294 रन्स करत भारतावर 122 रन्सनं आघाडी घेतली होती. 

मात्र राहुल आणि धवननं सलामीला 166 रन्सची दमदार पार्टनरशिप केली. दरम्यान टेस्टचा उद्या अखेरचा दिवस असल्यानं टेस्ट अनिर्णित राहण्याची शक्यता आहे.