टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?

कसोटीमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला धूळ चारली असली तर टी-20 चे राजे आम्हीच हे वेस्ट इंडिजच्या टीमने शनिवारच्या सामन्यात दाखवून दिले.

Updated: Aug 28, 2016, 08:41 AM IST
टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? title=

लॉडेरहिल : कसोटीमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला धूळ चारली असली तर टी-20 चे राजे आम्हीच हे वेस्ट इंडिजच्या टीमने शनिवारच्या सामन्यात दाखवून दिले.

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियावर एका धावेने विजय मिळवला. शेवटच्या चेंडूत भारताला विजयासाठी 2 धावांची गरज होती आणि स्ट्राईक होता कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे.

फिनिशर अशी ओळख असलेला धोनी शेवटच्या चेंडूत 2 धावा सहज काढेल असे वाटले होते. मात्र ब्राव्होने त्याल झेल देण्यास भाग पाडले आणि भारताला विजयाने हुलकावणी दिली. दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 अशी आघाडी घेतलीये.

आज या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा टी-20 सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवत टीम इंडिया पराभवाचा वचपा काढण्यास सज्ज झालीये. दुसरीकडे सलग दुसरा टी-20 सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा मानस वेस्ट इंडिजचा असेल.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता