आयपीएल आणि दुष्काळाच्या वादावर धोनी बोलला

महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आयपीएलचे सामने होऊ नयेत अशी मागणी होत आहे. 

Updated: Apr 10, 2016, 04:55 PM IST
आयपीएल आणि दुष्काळाच्या वादावर धोनी बोलला title=

मुंबई: महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आयपीएलचे सामने होऊ नयेत अशी मागणी होत आहे. यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल करण्यात आली आहे. 

या वादामध्ये आता महेंद्रसिंग धोनीनंही उडी मारली आहे. आयपीएल महाराष्ट्राबाहेर नेल्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे, असं धोनी म्हणाला आहे. 

दुष्काळामुळे आयपीएल राज्याबाहेर गेलं तरी काही फरक पडत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तर आयपीएल राज्याबाहेर गेलं तर राज्याचं 100 कोटी रुपयांचं नुकसान होईल असं बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले होते.