शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर थेट हल्ला चढवला.

Updated: Jun 9, 2014, 12:04 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर थेट हल्ला चढवला.
दिल्लीमध्ये सांप्रदायिक सरकार सत्तेवर आल्यानंतर विशिष्ट समुदायावरील हल्ले वाढले आहेत, अशी तोफ पवारांनी आज डागली.
पुण्यामध्ये अलिकडेच झालेल्या हिंसक घटना आणि आयटी प्रोफेशनल तरूणाची झालेली हत्या याकडे पवारांचा रोख होता.
दरम्यान आपण राष्ट्रीय राजकारणातच राहणार आहोत, आणि आपण समाधानी असल्याचंही शरद पवारांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.