मुंबई पालिकेकडे श्वानगृहासाठी पैसेच नाहीत

 हजारो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेला मुंबईतील भटक्‍या कुत्र्यांच्या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी श्वानगृह विकसित करण्यासाठी पैसेच नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघडकीस झालीय. 

Updated: Jun 28, 2014, 05:46 PM IST
मुंबई पालिकेकडे  श्वानगृहासाठी पैसेच नाहीत title=

मुंबई : हजारो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेला मुंबईतील भटक्‍या कुत्र्यांच्या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी श्वानगृह विकसित करण्यासाठी पैसेच नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघडकीस झालीय. 

भटक्‍या कुत्र्यांसाठी राज्य शासनाने पालघर इथं 18 एकर जागा अल्प किमतीत उपलब्ध करून दिली होती. मात्र श्वान गृह चालवणं पालिकेला आर्थिक दृष्ट्या शक्य नसल्याचं पालिकेनं राज्य सरकारला कळवलंय. आरटीआय कार्यकर्ते कमलाकर दरवडे यानी माहितीच्या अधिकरातून ही माहिती समोर आणलीय.

दरम्यान, भटक्या कुत्र्यांमुळं होणा-या त्रासाची आणखी एक घटना पुढे आलीय. मुंब्र्यात एका शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्यावर 100 टाक्के घालण्यात आले आहेत. तर दिल्लीत एका कुत्र्याने लहान मुलीवर हल्ला केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. अशा घटना घडत असताना मुंबईतही भटके कुत्रे आहेत. असे असताना खबरदारी घेण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उमट आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेच्या कारभाराबाबत आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.