'गोविंदा पथकांवरचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घ्या'

मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी गोविंदा पथकावरील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

Updated: Aug 27, 2016, 06:23 PM IST
'गोविंदा पथकांवरचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घ्या' title=

मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी गोविंदा पथकावरील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. सुप्रिम कोर्टाने घातलेल्या निर्बंधाची अनेक गोविंदा पथकांनी पायमल्ली केली होती. मुंबईत 29 मंडळांवर 21 गुन्हे तर ठाण्यात 20 मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. 

काही गोविंदा पथकांवर भारतीय दंडसंहिता कलम 308 हे सदोष मनुष्‍यवधाचे कलम लावण्‍यात आले आहे. यासह 336,188, 34 अशी विविध गंभीर स्‍वरूपाची कलमे लावण्यात आली. अशी गंभीर स्‍वरूपाची कलमं मागे घेण्यासाठी शेलारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे.