'गेट वे ऑफ इंडिया' जवळ ५४ जणांना वाचवण्यात यश

'मुंबईत गेट वे ऑफ इंडिया'जवळ कोस्ट गार्डच्या जवानांनी ५४ जणांना वाचवण्यात यश आलंय.  सुदैवाने आज ५४ प्रवाशांचे प्राण वाचले. हे सर्व प्रवासी एलिफंटाजवळ एका बोटीत अडकले होते.

Updated: Feb 17, 2015, 08:35 PM IST
'गेट वे ऑफ इंडिया' जवळ ५४ जणांना वाचवण्यात यश title=

मुंबई : 'मुंबईत गेट वे ऑफ इंडिया'जवळ कोस्ट गार्डच्या जवानांनी ५४ जणांना वाचवण्यात यश आलंय.  सुदैवाने आज ५४ प्रवाशांचे प्राण वाचले. हे सर्व प्रवासी एलिफंटाजवळ एका बोटीत अडकले होते.
 
या ५४ प्रवाशांमध्ये १८ लहान मुलं असल्याचंही कोस्ट गार्डच्या सुत्रांकडून सांगण्यात आलं. सुटका करण्यात आलेले प्रवासी एलिफंटा लेणी पाहण्यासाठी गेले होते, तिथून परतताना ही घटना घडली.
 
मुंबई किनाऱ्यापासून समुद्रात ३ ते ४ नॉटिकल मैलावर ही 'नवरंग' नावाची बोट जेटीजवळ अडकली. एलिफंटा लेण्यांपासून मुंबईकडे परत येणारी नाव जेटीजवळ अडकली, त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. त्यात अंधार पडू लागल्यानं गोंधळ आणखीच वाढला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.