कोल्हापूर येथील अपघात ठाण्याचे चार जण ठार

कागल येथे शुक्रवारी पहाटे ट्रक आणि क्वालिस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. हे सर्वजण ठाणे जिल्ह्यातील असल्याची माहिती हाती आली आहे.

Updated: Feb 6, 2015, 11:36 PM IST
कोल्हापूर येथील अपघात ठाण्याचे चार जण ठार title=

कोल्हापूर : कागल येथे शुक्रवारी पहाटे ट्रक आणि क्वालिस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. हे सर्वजण ठाणे जिल्ह्यातील असल्याची माहिती हाती आली आहे.

पहाटे येथील रस्त्यावरून जात असताना त्यांच्या क्वालिस गाडीचे टायर अचानक फुटले आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नेमक्या याचवेळेला रस्त्यावर मागून येणाऱ्या एका ट्रकने या गाडीला जोरदार धडक दिली. यात क्वालिस गाडीचा चक्काचूर झाला.

अपघातग्रस्त क्वालिस गाडीतील १० पैकी चार महिला जागीच ठार झाल्या असून, इतर सहा जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कोल्हापूरच्या प्राथमिक तसेच खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण मुळचे सोलापूरचे असून सध्या ते ठाणे जिल्ह्यातील वसई भागात राहत होते. 

जखमींमध्ये कांता महादेव कोकरे, वनिता तानाजी घोटुगडे, राकेश धर्मा भोई, सुमन बापू गोरड, जगन्नाथ जयराम भोई आणि तानाजी पांडुरंग घोटुगडे यांचा समावेश आहे. हे सर्वजण काल संध्याकाळी वसईहून चिंचणीमायक्का यात्रेसाठी निघाले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.