'लष्कर स्वाभिमानी, खंडणीचे पैसे नको'

आपलं लष्कर स्वाभिमानी आहे, त्यांना खंडणीतून उकळलेले पैसे नको, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Updated: Oct 23, 2016, 04:27 PM IST
'लष्कर स्वाभिमानी, खंडणीचे पैसे नको' title=

पणजी : आपलं लष्कर स्वाभिमानी आहे, त्यांना खंडणीतून उकळलेले पैसे नको, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ऐ दिल है मुश्कील या सिनेमाच्या रिलीजबद्दल जो तोडगा निघाला त्यासंदर्भात उद्धव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

कालच्या बैठकीत नक्की काय झालं, याची माहिती मला मिळाली नाही, पण हे तिघं अर्थातच मुख्यमंत्री राज ठाकरे आणि करण जोहर मिळून ये तो होनाही था नावाचा एक नवा सिनेमा काढतायत, असं म्हणत उद्धव यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.