लग्नानंतर नावात बदल नाही - राणी मुखर्जी

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी लग्नानंतर आपलं नाव बदलणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर रानी मुखर्जी हेच नावानं आपण पुढे वावरणार असल्याचं राणीनं स्पष्ट केलंय.

Updated: Jun 25, 2014, 04:15 PM IST
लग्नानंतर नावात बदल नाही - राणी मुखर्जी title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी लग्नानंतर आपलं नाव बदलणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर रानी मुखर्जी हेच नावानं आपण पुढे वावरणार असल्याचं राणीनं स्पष्ट केलंय.

राणीच्या अगोदर ऐश्वर्या राय – बच्चन, करीना कपूर – खान या अभिनेत्रींनी आपल्या पतीच्या आडनावाचा समावेश आपल्या नावात केलाय. परंतु, राणी मात्र असं करणार नाहीए... एप्रिल महिन्यात सिनेनिर्माता – दिग्दर्शक आदित्य चोपडासोबत राणी अत्यंत खाजगीरित्या इटलीमध्ये विवाहबद्ध झालीय.  

मंगळवारी आपल्या आगामी ‘मर्दानी’ या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगच्या निमित्तानं राणी मीडियासमोर हजर झाली होती. यावेळी, नावासंबंधी तिला प्रश्न विचारला असता ‘मी माझ्या नावावर खूप प्रेम करते... आणि त्यामुळे मी हेच नाव पुढेही वापरणार आहे. सिनेजगताशी जोडली गेलेली सगळीच मंडळी मला याच नावानं ओळखतात आणि ते पुढेही मला याच नावानं ओळखतील. खाजगी जिवनात माझ्या मुलांना जेव्हा शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तेव्हा मी माझं नाव बदलेन... पण, माझे फॅन्स मला नेहमीच रानी मुखर्जी याच नावानं ओळखतील’ असं राणीनं म्हटलंय.

राणीनं गुपचूप लग्न केल्यामुळेही तिच्या फॅन्सला धक्का बसला होता. याबद्दलही यावेळी राणीला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिनं ‘यामध्ये माझा कोणताच हात नव्हता. माझ्या नवऱ्यानं मला लग्नासाठी इटलीला येण्यासाठी सांगितलं होतं आणि मी काहीही बोलू शकले नाही. ही माझी पसंती नव्हती’ असं उत्तर राणीनं दिलंय.  

यापुढे आदित्यचं प्रोडक्शन हाऊसची जबाबदारीही संभाळणार का? या प्रश्नावर राणीनं प्रोडक्शन हाऊसपेक्षा घर सांभाळण्याला आपल्यासाठी अधिक महत्त्व असेल असंही म्हटलंय.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.