विराटच्या आयुष्यात अनुष्का परत येण्याची चिन्हं...

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये भारतानं शानदार विजय मिळवला... यानंतर विराट कोहलीच्या आयुष्यातही त्याचा आनंद परतल्याचं चित्र दिसतंय. 

Updated: Mar 2, 2016, 03:46 PM IST
विराटच्या आयुष्यात अनुष्का परत येण्याची चिन्हं...   title=

मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये भारतानं शानदार विजय मिळवला... यानंतर विराट कोहलीच्या आयुष्यातही त्याचा आनंद परतल्याचं चित्र दिसतंय. 

कारण, या मॅचनंतर त्याच्यावर रुसलेल्या त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं विराटला फोन केल्याचं 'बॉलिवूड लाईफ'नं म्हटलंय. त्यानंतर मंगळवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमधला विराटचा जलवा तुम्ही पाहिलाच असाल... 

सांगायची गोष्ट म्हणजे, ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच अनुष्कानं विराटला फोन केला होता. ब्रेकअपनंतर व्हॅलेंटाईन डेही या दोघांनी वेगवेगळा साजरा केला होता. 

 
नाही म्हणायला यानंतर विराटनं अनुष्काला मनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. त्याच्या याच प्रयत्नांना यश याल्याचं दिसतंय. यासाठी तो अनुष्काच्या भावाच्या संपर्कातही असल्याचं म्हटलं जात होतं. 

विशेष म्हणजे जेव्हा विराटने अनुष्काला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले होते तेव्हा त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली होती. त्यानंतर विराटने एका पार्टीदरम्यान आपण सिंगल असल्याचे म्हटले होते. तसेच विराटने इन्स्टाग्रामवर अनेक फोटोज शेअर करुन ब्रेकअप झाल्याचे सांगितले होते.