राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा

राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली. या भेटीत हा निर्णय घेण्यात आलाय. 

Updated: Feb 28, 2017, 06:35 PM IST
राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा title=

नवी दिल्ली : राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली. या भेटीत हा निर्णय घेण्यात आलाय.

या बैठकीत रायगडच्या विकासाच्या डीपीआरचे अधिकार राज्याकडे सोपवण्यात आले आहेत. यापूर्वी गड-किल्ल्यांच्या विकास आणि संवर्धनाबाबत परवानगी घेण्यासाठी दिल्लीचे हेलपाटे घालावे लागत होते. आता या निर्णयामुळं किल्ल्यांच्या विकासाचं काम त्वरीत हातात घेता येणार असून गड-किल्ल्यांची पडझड रोखता येणार आहे.

महेश शर्मांना भेटण्याआधी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तब्बल दीड तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. महापालिका निवडणूक, जिल्हापरिषद निवडणूक आणि मुंबईच्या महापौरपदाबद्दल मोदी आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.