दिशा सालियन मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप; बदनामी होत असल्याने आदित्य ठाकरे कोर्टात जाणार?

वारंवार होणा-या आरोपांमुळं प्रतिमा मलिन होत असल्याने आदित्य ठाकरे संतापाले आहेत. या आरोपांविरोधात ते कोर्टात दाद मागण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  दिशा सालियान प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यानंतर आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न होत आहे.

Updated: Dec 25, 2022, 10:27 PM IST
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप; बदनामी होत असल्याने आदित्य ठाकरे कोर्टात जाणार?  title=

Disha Salian Death Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन हिवाळी अधिवेशानात (Maharashtra Winter Session 2022 ) चांगलाच गदारोळ माजला आहे.  शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी देखील खळबळजनक दावे केले आहेत. दिशा सालियान प्रकरणात लावलेल्या आरोपांविरोधात आदित्य ठाकरे कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. 

वारंवार होणा-या आरोपांमुळं प्रतिमा मलिन होत असल्याने आदित्य ठाकरे संतापाले आहेत. या आरोपांविरोधात ते कोर्टात दाद मागण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  दिशा सालियान प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यानंतर आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न होत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण 

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) A U नावाने 44 फोन आले होते, हा A U म्हणजे आदित्य-उद्धव (Aditya-Uddhav Thackeray) असल्याची बिहार पोलिसांनी (Bihar Police) माहिती दिल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला होता. यावरुनच हिवाळी अधिवेशनात देखील गदारोळ माजला होता. महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजत आहे. दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. 

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिशा सालियन प्रकारणात महत्वाची घोषणा

दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत होणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाहीर केले. दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयकडे कधीच नव्हता, त्यामुळे सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिलेला नाही असंही फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.   

विविध मुद्यांवरुन जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हे जुन प्रकरण उकरुन काढल्याचे प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. माझ्या विरोधात अत्यंत घाणेरडे राजकारण सुरु असल्याचेही आदित्य म्हणाले.