मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण ठणठणीत बरे

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यात मोठे यश मुंबईत आले आहे. आतापर्यंत एकट्या मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण बरे झाले आहेत. 

Updated: Aug 13, 2020, 07:30 AM IST
मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण ठणठणीत बरे   title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यात मोठे यश मुंबईत आले आहे. आतापर्यंत एकट्या मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुंबई उपनगरात रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. काल राज्यात १३ हजार ४०८ एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची माहिती रोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी देखील नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून काल  १२ हजार ७१२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.६४ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४७ हजार ५१३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरु आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी  दिली.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवारी राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. २४ सात राज्यात १२ हजार ७१२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात ३४४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढता असताना, दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासा देणारी बाब आहे. राज्यातील आतापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ४८ हजार ३१३ इतकी झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ८१ हजार ८४३ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.  

बुधावारी निदान झालेले १२,७१२ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३४४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११३२ (५०), ठाणे- २२९ (१), ठाणे मनपा-२२० (०),नवी मुंबई मनपा-४३२ (३), कल्याण डोंबिवली मनपा-३८६ (१५),उल्हासनगर मनपा-२९ (२), भिवंडी निजामपूर मनपा-२० (१), मीरा भाईंदर मनपा-१४५ (११), पालघर-२४९ (९), वसई-विरार मनपा-२१४ (४), रायगड-२२१ (३), पनवेल मनपा-१९३, नाशिक-२७२ (८), नाशिक मनपा-८१६ (१८), मालेगाव मनपा-४४ (२),अहमदनगर-३३८ (३),अहमदनगर मनपा-२९५ (३), धुळे-३७ (२), धुळे मनपा-५३ (१), जळगाव-३५३ (११), जळगाव मनपा-६३ (५), नंदूरबार-३५ (४), पुणे- ३६९ (११), पुणे मनपा-१६६५ (१९), पिंपरी चिंचवड मनपा-९४८ (११), सोलापूर-३२० (८), सोलापूर मनपा-६० (३), सातारा-२७० (८), कोल्हापूर-३९६ (१७), कोल्हापूर मनपा-२३८ (२), सांगली-८८ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-९३ (१०), सिंधुदूर्ग-३०, रत्नागिरी-८१ (२), औरंगाबाद-२१३ (२), औरंगाबाद मनपा-११६ (१), जालना-९६ (३), हिंगोली-२७ (१), परभणी-१७ (३), परभणी मनपा-३९ (४), लातूर-१६६ (१०), लातूर मनपा-७७ (६), उस्मानाबाद-१२१ (७), बीड-९४ (२), नांदेड-१०९ (५), नांदेड मनपा-२५ (५), अकोला-१३ (१), अकोला मनपा-३१ (१),अमरावती-४१ (१), अमरावती मनपा-६३ (३), यवतमाळ-१३९ (१), बुलढाणा-५४ (१), वाशिम-३७ (१), नागपूर-३१८ (५), नागपूर मनपा-४५४ (२४), वर्धा-११, भंडारा-१८ (१), गोंदिया-२७ (२), चंद्रपूर-३६, चंद्रपूर मनपा-९ (१), गडचिरोली-१३, इतर राज्य १४ (२).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ८ हजार ८८७ नमुन्यांपैकी ५ लाख ४८ हजार ३१३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख १५ हजार ११५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ८८० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३४४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.