ऊर्जामंत्र्यांकडून कृषी पंपांची थकबाकी वसूल करण्याचे सक्तीचे आदेश

तातडीने वीज बिलाची वसुली करा.

Updated: Sep 28, 2018, 06:59 PM IST
ऊर्जामंत्र्यांकडून कृषी पंपांची थकबाकी वसूल करण्याचे सक्तीचे आदेश title=

मुंबई: राज्यातील कृषी पंपधारक वीज ग्राहकांकडून वीज बिलाची थकबाकी वसूल करण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळ असताना वीज बिल वसुलीचे आदेश निघाल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. 

२५ हजार रुपयांपेक्षा कमी वीज बिल थकबाकी असल्यास ३ हजार रुपये तातडीने वसूल करण्याचे आदेश देण्यात आलेत. तर २५ हजार रुपयांपेक्षा जास्त वीज बिल थकीत असल्यास ५ हजार रुपये तातडीने वसूल करण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार कृषीपंपधारकांची थकीत वीज बिल वसुली सक्तीने करण्याचे पत्र महावितरणने राज्यभरातील सर्व अभियंत्यांना पाठवले आहे.