मुलींच्या तस्करीवरून विधानसभेत रणकंदन

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला.

Updated: Aug 3, 2017, 07:36 PM IST
 मुलींच्या तस्करीवरून विधानसभेत रणकंदन title=

मुंबई : लातूरमध्ये महिलांची मोठी तस्करी होत असल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला.

या तस्करीशी काँग्रेसशी संबंधित एका महिलेचा संबंध असल्याचा आरोप देवयानी फरांदे यांनी केला. त्यावर अजित पवार यांनी तावातावानं हे आरोप नाकारले. 

तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल, असं आश्वासन लातूरचे पालकमंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांनी दिलं आहे.