नागपूरला देशाची राजधानी करा

दिल्लीत वाढलेल्या प्रदुषणामुळे नागपूरला देशाची राजधानी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा सल्ला दुसरा तिसरा कोणी दिला नसून चक्क अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनीच दिला आहे.

Updated: Nov 18, 2017, 10:25 PM IST
 नागपूरला देशाची राजधानी करा  title=

नागपूर : दिल्लीत वाढलेल्या प्रदुषणामुळे नागपूरला देशाची राजधानी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा सल्ला दुसरा तिसरा कोणी दिला नसून चक्क अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनीच दिला आहे.

नागपुरात कार्यक्रम 

त्यामूळे या वक्तव्यावर चहुबाजूने प्रतिक्रीया उमटत आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या  नागपुरातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रदुषणाचा त्रास

नागपूर शहरात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमाचे मोठ्या स्तरावर आयोजन करण्यात आले आहे.  गेल्या काही वर्षापासून सातत्याने प्रदूषणाचा त्रास होत असल्यामुळे देशाच्या नवीन राजधानीचे शहर शोधणे आवश्यक असल्याचे जाणवलं असं श्रीश्री यांनी म्हटलं.