भात खाल्ला म्हणून मित्र संतापला, डोक्यात काठी घालून मित्रालाच संपवला, धक्कादायक घटना

भाताचा हिस्सा न दिल्याने खून करून टाकल्याचे धक्कादायक प्रकार घडला आहे.

Updated: Sep 25, 2022, 01:32 PM IST
भात खाल्ला म्हणून मित्र संतापला, डोक्यात काठी घालून मित्रालाच संपवला, धक्कादायक घटना title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : गुन्हेगारीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील पण शहरात नुकतीच घडलेली घटना मात्र वेगळी आहे. या घटनेचं वेगळेपण म्हणजे मारेकऱ्याने चक्क खाण्यासाठी भाताचा हिस्सा न दिल्याने हत्येची घटना शहरात घडली आहे. 

दारू पिल्यानंतर जेवणकरताना अरविंद बारब्देने (वय 75 वर्षे) भात एकट्यानेचे खाऊन घेतला. यावरून देवराव बारस्कार (वय 38 वर्षे) आणि अरविंदमध्ये वाद झाला. संतप्त देवरावने रागाच्या भरात भाताचा हिस्सा न दिल्याने अरविंदच्या डोक्यावर काठी मारून हल्ला केला व अरविंदची हत्या केली.

नागपूर शहरालागत वाडी परिसरात अरविंद बारब्दे आणि देवराव हे राहत होते. याच भागातील आंबेडकर नगर मधील निर्मनाधीन इमारतीत अरविंद आणि देवरवची ओळख झाली. दोघेही दारूचे व्यसनाधीन असल्याने घटनेच्या दिवशी(ता.21) अरविंदने देवरावला दारू आणायला 40 रुपये दिले. परत येताना देवरावने स्वतःच्या पैश्याने जेवण आणलं. त्यानंतर दोघांनी मनसोक्त दारू पिली. त्यानंतर, जेवण करताना अरविंदने पूर्ण भात खाऊन घेतला. म्हणून, संतप्त झालेल्या देवरावने जोरदार भांडण करत शिवीगाळ केली. यात अरविंदचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक पोलिसांनी यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पण शवविच्छेदनाच्या अहवालात हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याने वाडी पोलीसानी नेमकं काय घडले याचा शोध सुरू केला. 

असा घेतला मारेकऱ्याचा शोध...

या तपासात त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटोज तपासले, विचारपूस केली पण हातात काही लागले नाही. यादरम्यान, तपासात सीसीटीव्ही मध्ये एक व्यक्ती संशयीत आढळल्याने पोलिसांनी त्याच्या शरीरयष्टीवरून त्याला शोधलं. देवरावला ताब्यात घेत विचारपूस केली असता, देवरावने हत्येचा घटनाक्रम सांगितला. वाडी पोलिसांनी हत्येचा गुन्ह्यात देवरवला अटक केली. भाताचा हिस्सा न दिल्याने खून करून टाकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं.