महाराष्ट्र एसआयटी पथक घेणार परशुराम वाघमारेचा ताबा

Updated: Jun 18, 2018, 12:19 PM IST

कोल्हापूर: गौरी लंकेश हत्या प्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी परशूराम वाघमारे याला ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटीचं पथक बंगळुरूला रवाना होत आहे. मात्र, कर्नाटक एसआयटी या प्रकरणाचा कसून तपास करत असल्याने वाघमारेचा ताबा महाराष्ट्र एसआयटीला मिळेल का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे, एमएम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात परशुराम वाघमारे आणि इतरांच्या अटकेमुळे महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस आलं आहे. 

चौघांच्याही हत्येचं मूळ एकच

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्यप्रदेश या चारही राज्यात या हत्येची पाळेमुळं असल्याची चर्चा आहे. शिवाय लंकेश, पानसरे, कलबुर्गी आणि दाभोलकर यांच्या हत्येचं मूळ एकच असल्याचं समोर येतंय. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानुसार पानसरे आणि कलबुर्गीच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तुलच लंकेश यांची करण्यासाठी वापरण्यात आली. यापूर्वी गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणात प्रमुख संशयीत आरोपी समीर गायकवाड यांच्या चौकशीसाठी कर्नाटक एस.आय.टी कोल्हापूरला आली होती.

महाराष्ट्र एस.आय.टीला परशुरामचा ताबा मिळेल का?

डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ.एम.एम.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येच्या पार्श्वभुमीवर कर्नाटक पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये माहितीची देवाण घेवाण होते. कर्नाटक एस.आय.टी परशुराम वाघमारे आणि इतर पाच आरोपींची कसुन तपास करत आहे, त्यामुळं महाराष्ट्र एस.आय.टीला चौकशीसाठी परशुरामचा ताबा मिळणं मुश्किल मानलं जातंय.