जायकवाडीला पाणी सोडण्यावरुन नाशिक पालिकेत जोरदार हंगामा

जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरू असलेला विरोध अधिक तीव्र. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी.

Updated: Oct 26, 2018, 05:41 PM IST
जायकवाडीला पाणी सोडण्यावरुन नाशिक पालिकेत जोरदार हंगामा title=

नाशिक : जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरू असलेला विरोध अधिक तीव्र झालाय. नाशिक महापालिकेच्या महासभेत याच विषयावरुन मांडलेल्या लक्षवेधीत चांगलाच गदारोळ झाला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सिंचन भवनावर हल्लाबोल करत, मुख्य अभियंत्यांच्या दालनात निदर्शनं केली. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता किशोर कुलकर्णी यांच्या दालनात मनपाच्या विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केलं. 

सभागृहात सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, चर्चा नको कृती हवी अश्या घोषणादेत बाहेर पडले आणि त्यानंतर सभागृहातील विरोधकांनी थेट जलसंपदा कार्यालयाकडे कूच करत मुख्य अभियंता यांच्या कार्यलयात ठिय्या दिला. यावेळी जलसंपदा विभगातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची चांगलीच धांदळ उडाली.

मात्र महासभेत चर्चा काय कामाची जलसंपदा मंत्री असतांना त्यांच्या भोवती पिंगा घालणारे आमदार काय करताय असा खडा सवाल शिवसेनेने केलाय.तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सक्षम आहोत न्यायलयीन लढाई चालू आहे, रस्त्यावरची लढाई देखीळ चालू राहील अशी भूमिका विरोधी पक्षांनी बजावलीय. 
 
चर्चा नको, कृती हवी अशा घोषणा सभागृहात दिल्या.  सभागृहात सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. अखेर या गोंधळामुळे महासभा गुंडाळण्यात आली. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात भावली भाम आणि वाकी धरणातून दारणा धरणात पाण्याचा विसर्ग सुरु झालाय. जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी दारणा धरणात जलसाठा करण्यास सुरुवात आलीय. जलसंपदा विभागाने पाणी सोडण्यास सुरुवात केलीय.