जळगावमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार

जळगावमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुंटुंबातील चार जण ठार झाले आहेत. 

Updated: May 7, 2024, 09:36 PM IST
जळगावमध्ये भीषण अपघात;  एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार  title=

Jalgaon Local News Update : जळगावमध्ये भीषण अपघात झाला आहे.  जळगाव शहरातून पाचोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार झाले आहेत. 
मृतात तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. घटनेनंतर पोलीस पाटील आल्यानंतर वातावरण चिघळल्याने ग्रामस्थ संतप्त झाले, रास्तारोको करीत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

शिरसोली येथील रहिवासी असलेल्या राणी सरदार चव्हाण या मुलगा सोहम (वय – ७ वर्षे) सोहमसह चार आणि 16 वर्षाचा भाचा असे चौघे इलेक्ट्रिक बाईकने (वाहन क्रमांक एमएच. 19.ईई. 8925)  शिरसोलीकडे जात होते.  रामदेववाडी गावाच्या पुढे घाट मार्गावर जळगावकडून येत असलेल्या कारने ( वाहन क्रमांक एमएच. 19.सीव्ही.6767) त्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दुचाकी चक्काचूर झाली असून चारचाकी रस्त्याच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेचा कंपाऊंड तोडून आत शिरली. अपघातात दुचाकीवरील चौघे जागीच ठार झाले. 

वातावरण अधिकच चिघळल्याने दगडफेक देखील झाली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक , एमआयडीसी पोलीस ठाण्याचे  यांच्यासह आरसीपी प्लॅटून आणि पोलिसांचा मोठा ताफा पोहचला आहे.