राज्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का! राष्ट्रीय महामार्गावर रोज 24 जण अपघातात गमावतात जीव

Road accidents : राज्यात दररोज कुठे न कुठे अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव जात असतो. अशातच  माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे.

श्वेता चव्हाण | Updated: Mar 23, 2024, 03:40 PM IST
राज्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का! राष्ट्रीय महामार्गावर रोज 24 जण अपघातात गमावतात जीव  title=

Road accidents News in Marathi : राज्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्ग चांगले असतानाही वेग नियंत्रणाअभावी अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले.  दररोज होणाऱ्या किरकोळ तसेच गंभीर स्वरुपाच्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आगे. गेल्या 14 महिन्यांत महाराष्ट्रात दोन्ही प्रकारच्या महामार्गांवर 19 हजारांहून अधिक अपघात झाले असून 125 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात महामार्गावरील अपघातांमध्ये दररोज सरासरी 24 जणांचा मृत्यू होतात. अशी माहितीच्या अधिकारातून धक्कादायक माहीती समोर आली आहे.

अतिवेगाने आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे हे रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय दारूच्या नशेत वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे ही कारणे रस्त्यावरील अपघातांना कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. तसेच धक्कादायक बाब म्हणजे हेल्मेट न घातल्याने दुचाकीस्वारांच्या अपघातात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान राज्य महामार्गांच्या तुलनेत 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या दोन महिन्यांत राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दुप्पट झाली आहे.  राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची आकडेवारी गोळा केली तर या कालावधीत 2 हजार 802 अपघात झाले असून 1 हजार 418 मृत्यू झाले आहेत.

1 जानेवारी ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राज्य महामार्गांवर 518 नागरिकांचा मृत्यू आणि राष्ट्रीय महामार्गांवर 900 नागरिकांचा मृत्यू असलेल्या 1,818 अपघातांसह 984 अपघात झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी हीच आकडेवारी समोर आणली आहे ज्यावरून राष्ट्रीय महामार्गांवर महाराष्ट्र राज्य महामार्गाच्या तुलनेत जवळपास दुप्पट अपघात आणि मृत्यू झाल्याचे दिसून येते.

1 जानेवारी 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत नागपूर शहर, पुणे शहर, मुंबई शहर, छत्रपती संभाजीनगर शहर किंवा चार शहरांमधील अपघातांची आकडेवारी पाहता मुंबईत सर्वाधिक 2 हजार 892 अपघात झाले असून त्यात 426 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसचे नागपुरात 382, ​​अपघात 1,426, पुण्यात 413 मृत्यू, 1,471 अपघात, छत्रपती संभाजीनगर येथे 708 अपघातात 234 मृत्यू झाले.