मग लग्नच का केलं? लग्नानंतर 21व्या दिवशीच पत्नीने पतीला संपवलं, कारण...

नवविवाहीत तरुणाच्या खूनाने बीडमध्ये खळबळ, पत्नीच निघाली मारेकरी, धक्कादायक कारण आलं समोर  

Updated: Nov 13, 2022, 06:45 PM IST
मग लग्नच का केलं? लग्नानंतर 21व्या दिवशीच पत्नीने पतीला संपवलं, कारण... title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : अवघ्या एकवीस दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या एका तरुणाचा मृतदेह त्याच्याच बेडरुममध्ये आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यावेळी त्याच्यासोबत पत्नी होती. पत्नीने बेडरुम बाहेर येऊ कुटुंबियांना पती बेशुद्ध पडल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 7 नोव्हेंबला तालुक्यातील निपाणीजवळ ही धक्कादायक घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता. 

नेमकी घटना काय?
निपाणीजवळच्य तांडा गावात राहणाऱ्या पांडुरंग राजाभाऊ चव्हाण या बावीस वर्षांच्या तरुणाचा बीड जिल्ह्यातल्या पौळाचीवाडी इथं रहाणाऱ्या शितल नावाच्या मुलीशी विवाह मोठ्या धुमधडाक्यात झाला. पण लग्न झाल्याच्या दिवसापासून शितलने पांडुरंगशी भांडण सुरु केलं. कारण काय तर पांडुरंग तिला आवडत नव्हता. यावरुन ती लग्न झाल्यापासून रोज त्याच्याशी भांडण करत होती.

शितलने रचला बनाव
7 नोव्हेंबरला रात्री अकरा-साडे अकराच्यादरम्यान अचानक शितल बेडरुममधून बाहेर येऊन आरडा ओरडा करु लागली. सासू-सासऱ्यांनी तिला काय झाल्याचं विचारलं. यावर पांडुरंग हे अचानक गार पडल्याचं शितलने सांगितलं. कुटुंबियांनी तात्काळ पांडुरंगला रुग्णालयात नेलं. पण तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तपासादरम्यान मृत पांडुरंच्या गळ्याभोवती काही खून दिसल्या. त्यामुळे पांडुरंगचा गळा दाबून खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

सुनेनेच म्हणजे शितलने पांडुरंगला मारल्याचं आरोप सासू-सासऱ्यांनी केला. शितलविरोधात पांडुरंगची आई निलाबाई चव्हाण यांनी पोलीस  स्थानकात गुन्हाही दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयावरुन शितल हिला ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत.