साखर झाली कडू, २०० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहणार?

 राज्यातील  साखर  कारखानदारांना निर्यात  परवडत नाही. 

Updated: Aug 25, 2018, 12:32 PM IST
साखर झाली कडू, २०० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहणार? title=

मुंबई : ब्राझीलचं चलन घसरल्यानं त्याचा परिमाण साखरेच्या किंमतीवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. गेल्या दहा वर्षातील हे सर्वात कमी दर आहेत. याचा  परिणाम भारतातील साखर उद्योगावर होणार आहे. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा दर प्रति टन ६०० डॉलर इतका होता. तो घसरून प्रति टन ३०६ डॉलरवर म्हणजे निम्यावर आला आहे. म्हणजे  सारखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात २१ रूपये किलोचा दर मिळाला होता. त्यामुळचं राज्यातील  साखर  कारखानदारांना निर्यात  परवडत नाही.

साखरेचे उत्पादन 

 गेल्या गळीत हंगामात ३२२ लाख मेटृीक टन साखरेचे उत्पादन झाले होते, त्यातील १०० लाख मेट्रीक टन साखर शिल्लक असून ती निर्यात होणं अपेक्षित होतं. त्यातच येत्या गळीत हंगामात सुमारे ३५५ लाख मेटृीक टन साखर उत्पादन होईल. 

साखर शिल्लक

देशांतर्गत साखरेची गरज वार्षिक २५५ लाख मेटृीक टन इतकी असल्यानं पुन्हा १०० लाख मेटृीक टन साखर शिल्लक राहिलं. म्हणजे २०० लाख मेटृीक टन साखर शिल्लक राहणार आहे. ही परिस्थीती कायम राहिल्यास शेतकऱ्यांना साखर कारखान्यांना एफआरपी देणं शक्य होणार नाही.