नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाईला वेग, मुख्य कमांडर सुरक्षा दलाच्या टार्गेटवर

जवानांवरील हल्ल्यानंतर भारतीय जवानांकडून तीव्र कारवाईची तयारी

Updated: Apr 5, 2021, 01:55 PM IST
नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाईला वेग, मुख्य कमांडर सुरक्षा दलाच्या टार्गेटवर title=

विजापूर : छत्तीसगडच्या विजापूरमध्ये ज्याप्रकारे नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला त्या नक्षलवाद्यांविरूद्ध आता मोठी मोहीम तयार केली गेली आहे. या मोहिमेत नक्षलवाद्यांच्या प्रमुख कमांडरांचा खात्मा करण्याची तयारी केली गेली आहे.

कालच्या आढावा बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईला वेग देणाचे सांगितले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी ह्यूमन इंटेलिजेंस आणि टेक्निकल इंटेलिजेंसची मदत घेतली जाईल. एवढेच नव्हे तर एनटीआरओ रिअल टाईम माहिती देऊन सुरक्षा यंत्रणांना मदत करेल.

मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी कमांडरची यादी बनवून सुरक्षा संस्था लवकरच त्यांच्याविरूद्ध मोठी कारवाई सुरू करणार आहे. ऑपरेशन प्रहार-3 अंतर्गत निर्दोष तरुणांचं ब्रेनवॉश करणारे आणि नक्षलवादी कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या बड्या नक्षलवाद्यांना लक्ष्य करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुरक्षा दलांनी पीएलजीए -1 चा सर्वोच्च कमांडर हिडमा याच्यासह नक्षलवाद्यांचे सर्वोच्च कमांडर याची यादी तयार केली आहे. ज्यांच्यावर कारवाईसाठी आता कारवाईला वेग आला आहे.

नक्षलवादी हल्ल्यात 22 जवान शहीद

शनिवारी 3 एप्रिल 2021 रोजी छत्तीसगडच्या विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाली. नक्षलवाद्यांनी 700 सैनिकांना घेरले आणि त्यांच्यावर हल्ला केला. या चकमकीत 22 सैनिक शहीद झाले आहेत. घटनास्थळावरून एका जवानाचा मृतदेह सापडला होता. तर 21 सैनिक बेपत्ता होते.

4 एप्रिल रोजी शोध मोहिमेदरम्यान आणखी 21 जवानांचे मृतदेह सापडले. एक जवान अद्याप बेपत्ता आहे, ज्याचा शोध सुरु आहे. या चकमकीत 31 सैनिक जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये कोब्रा बटालियन, डीआरजी, एसटीएफ आणि बस्तरिया बटालियनचे जवान समाविष्ट आहेत.

नक्षलवाद्यांविरोधात कारवाई तीव्र केली जाईल: अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज छत्तीसगडमधील जगदलपूरला पोहोचले. यावेळी अमित शाह म्हणाले की, आदिवासी भागातील विकासकामे वेगवान करुन नक्षलवाद्यांविरूद्ध कारवाई जलदगतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, केंद्र आणि छत्तीसगड सरकार एकत्रितपणे नक्षल समस्येवर लढा देत आहेत, लढा अखेरपर्यंत नेण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत, आम्ही लढा आणखी तीव्र करू आणि विजय मिळवू.