मूर्ती एक पण मंदिर दोन! महाभारत काळातील या रहस्यमय मंदिराचं गुढं काय? जाणून घ्या

हे मंदिर श्री माता भीमेश्वरी देवीचे मंदिर आहे, जे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. रिपोर्ट्सनुसार या मंदिराचा संबंध महाभारत काळाशी आहे.

Updated: Jul 2, 2022, 06:32 PM IST
मूर्ती एक पण मंदिर दोन! महाभारत काळातील या रहस्यमय मंदिराचं गुढं काय? जाणून घ्या title=

मुंबई : भारतामध्ये अनेक प्रकारचे मंदिर आहेत. ज्याचे वेगवेगळे बांधकाम आणि वैशिष्ट आहे. जे लोकांना नेहमी आश्चर्यचकीत करत असतात. सध्या भारतातील हरियाणा येथेल एक मंदिर चर्चत आलं आहे. हे मंदिर श्री माता भीमेश्वरी देवीचे मंदिर आहे, जे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. रिपोर्ट्सनुसार या मंदिराचा संबंध महाभारत काळाशी आहे. श्री माता भीमेश्वरी देवीचे मंदिर हे हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील बेरी येथे आहे आणि या मंदिरेने वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिरात मूर्तीतर एक आहे, परंतु येथे मंदिर मात्र दोन आहेत.

होय, तुम्ही बरोबर वाचलात, तुम्हाला देखील हे जाणून आश्चर्य वाटलं असेल ना? आणि मनात प्रश्न उभा राहिला असेल की, असं का? चला तर याबद्दल जाणून घेऊ या.

या मंदिरात ठेवण्यात आलेली मूर्ती पांडूपुत्र भीमाने आणल्याचे सांगितले जाते. असे मानले जाते की जेव्हा महाभारत युद्ध सुरू होणार होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने भीमाला कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी पाठवले होते. कुल देवी हिंगलाज पर्वतावर (आता हा पर्वत पाकिस्तानात आहे) विराजमान होती.

भीम तिथे पोहोचला आणि कुलदेवीला त्याच्यासोबत चालण्याची त्याने विनंती केली, तेव्हा कुल देवी म्हणाली की, तु मला तुझ्या मांडीवर घे आणि तु मला जिथे सोडले त्यापेक्षा मी पुढे जाणार नाही. भीमाने ते मान्य केले आणि आई कुलदेवीसह हिंगलाज पर्वत सोडला.

चालत असताना भीम हरियाणातील बेरी गावातून गेला आणि तेथे ल्याला लघुशंकाला आली म्हणून त्याने देवीला खाली ठेवले. ज्यानंतर भीमने पुन्हा देवीला उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती तेथून हलली नाही आणि तिने भीमला तिने घातलेल्या अटीची आठवण करुन दिली. त्यामुळे भीमलाही कुलदेवतेला तेथून हलवता आले नाही.

तेव्हापासून ही माता बेरीमध्ये आहे. यानंतर भीमाने बेरीमध्ये मंदिर बांधून मातेची स्थापना केली आणि कुरुक्षेत्राला निघून गेला. तसेच हे मंदिर श्री माता भीमेश्वरी देवी म्हणून ओळखले जाऊ लागले.

मूर्ती एक आणि मंदिर दोन असण्याचे कारण?

माँ भीमेश्वरी देवीची मूर्ती एक असली तरी त्यासाठी दोन मंदिरे बांधण्यात आली आहेत. खरेतर असे सांगितले जाते की, ही कुलदेवता आई रात्री आतील मंदिरात विसावते आणि दिवसा भक्तांना दर्शन देण्यासाठी बाहेरील मंदिरात बसते. असे मानले जाते की आतील मंदिर हा ऋषी दुर्वासांचा आश्रम आहे, ऋषींनी आईला त्यांच्या आश्रमात येण्याची विनंती केली होती, म्हणून आई दररोज रात्री तेथे विश्रांती घेते.