Gandhi Jayanti 2023 : 'या' 10 मुद्द्यांच्या मदतीने लिहा गांधी जयंतीवर निंबध, पहिला नंबर आलाच म्हणून समजा

Gandhi Jayanti Speech in Marathi : 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची 154 वी जयंती आहे. या निमित्ताने शाळेत वकृत्त्वस्पर्धा आयोजित करण्यात येते. या 10 मुद्द्यांच्या आधारे त्या उत्कृष्ठ भाषण. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 30, 2023, 09:20 AM IST
Gandhi Jayanti 2023 : 'या' 10 मुद्द्यांच्या मदतीने लिहा गांधी जयंतीवर निंबध, पहिला नंबर आलाच म्हणून समजा  title=

Gandhi Jayanti Speech 10 Tips : दरवर्षी भारतात २ ऑक्टोबर रोजी 'गांधी जयंती' साजरी केली जाते. या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म झाला. गांधीजींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्यांनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. कोणताही हिंसाचार न करता बापूंनी ब्रिटिश साम्राज्याशी सामना केला. गांधी जयंतीवर भारताच्या विविध शाळांमध्ये वाद-विवाद, भाषण किंवा निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या लेखाच्या माध्यमातून आपण १० महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहेत. ज्याद्वारे तुम्हाला महात्मा गांधी यांच्यावर भाषण देणे सोपे होईल. 

गांधी जयंतीवर स्पीच कसे द्याल? 

  • गांधी जयंतीवर भाषण देताना सुरूवातीला आपल्या गुरूजनांचे आणि दर्शकांचे आभार मानून त्यांना संबोधित करावे 
  • भाषण देताना ते मोचकेच आणि थोडक्यात असावे. 
  • चेहऱ्यावरती तणाव न दिसू देता. थोड हास्य ठेवावे. 
  • आत्मविश्वासाने आपले विचार मांडा. 
नाव  मोहनदास करमचंद गांधी 
पद राष्ट्रपिता (बापू)
जन्म  2 ऑक्टोबर 1869
आई  पुतळीबाई 
वडील  करमचंद गांधी 
पत्नी कस्तुरबा गांधी 
मुले  हरिलाल, मणिलाल, रामदास, देवदास
मृत्यू  30 जानेवारी 1948
शिक्षण  वकिली 
मुख्य आंदोलन   दक्षिण आफ्रिकेचे आंदोलन 
  असहयोग आंदोलन 
  स्वराज्य 
  भारत छोडो आंदोलन 
प्रसिद्ध वाक्य अंहिसा परमो धर्म 
प्रसिद्ध सिध्दांत सत्य, अहिंसा, परोपकार 
 
गांधी जयंतीवरील निबंधावरील 9 महत्त्वाचे मुद्दे 
  1. सुप्रभात आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो .. आज आपण राष्ट्रपिता बापू महात्मा गांधी यांच्या जयंतीवर साजरी करत आहोत. 
  2. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात पोरबंदर या गावी झाला. 
  3. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळीबाई गांधी असे होते. 
  4. गांधीजींचा विवाह कस्तुरबा गांधी यांच्याशी झाले. 
  5. बापू आपल्या अहिंसा आणि सत्य या क्रांतीकारी सिध्दांतामुळे जगभर ओळखले जातात. 
  6. ते भारतातील महान स्वातंत्र्य सेनानी, नेता, समाज सुधारकासमान आहेत. 
  7. गांधीजींनी सत्याग्रह आणि अहिंसाच्या मदतीने भारतात स्वातंत्र्य मिळवून गिले. 
  8. त्यांनी लाखो भारतीयांना आणि जगभरातील लोकांना अहिंसेने आपल्या अधिकार आणि स्वातंत्र्यकरिता लढण्यासाठी प्रेरित केले. 
  9. 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींचा जन्म गोळी मारून हत्या करण्यात आली.