Weight Loss Diet: तुम्हालाही लवकर वजन कमी करायचे आहे का? आहारात या एका गोष्टीचा समावेश करा

 वजन वाढणे (weight gain) ही आजकालच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक आहे. ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यामुळे मधुमेह (Diabetes ), हाय ब्लड प्रेशर, कॅन्सर, कोरोना व्हायरससह अनेक गंभीर आजारांचा धोका असू शकतो. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत पण सर्वात आधी बैठी जीवनशैली सोडून आहाराकडे लक्ष द्यावे लागेल.

Updated: Nov 4, 2022, 03:10 PM IST
Weight Loss Diet: तुम्हालाही लवकर वजन कमी करायचे आहे का? आहारात या एका गोष्टीचा समावेश करा  title=

Weight Loss Diet: वजन वाढणे (weight gain) ही आजकालच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक आहे. ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यामुळे मधुमेह (Diabetes ), हाय ब्लड प्रेशर, कॅन्सर, कोरोना व्हायरससह अनेक गंभीर आजारांचा धोका असू शकतो. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत पण सर्वात आधी बैठी जीवनशैली सोडून आहाराकडे लक्ष द्यावे लागेल.

जर तुम्हालाही स्लिम-ट्रिम करायचे असेल तर आजपासूनच तुमच्या आहारात नारळ पाण्याचा समावेश करा. त्यात मुबलक प्रमाणात बायो-एक्टिव्ह एन्झाईम असतात जे तुमचे पचन आणि चयापचय गतिमान करतात. सुधारित चयापचय जलद वजन कमी करतेय.

 नारळाचे अन्य घरगुती उपयोग

नारळ (Coconut) हा आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वपूर्ण पदार्थांपैकी एक होय. भारतात काही प्रदेश असे आहेत जेथे नारळाच्या खोबऱ्याचा किंवा मसाल्याचा वापर केल्याशिवाय जेवण होत नाही. नारळाचे अन्य सुद्धा घरगुती उपयोग आहेत. त्यापैकीच एक उपयोग म्हणजे नारळ पाणी पिण्याचा शरीराला होणारा फायदा होय. नारळातील पाणी हे अतिशय पौष्टिक मानले जाते. जसे ते थोरांसाठी उपयुक्त असते तसेच ते लहान मुलांसाठी देखील अतिशय फायद्याचे ठरते.

या फळात कमी कॅलरीज असतात

तुम्ही नारळाच्या पाण्याला तुमच्या रोजच्या आहाराचा भाग बनवू शकता. यामध्ये इतर फळांच्या तुलनेत खूपच कमी कॅलरीज असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे एक उत्तम पेय आहे. सकाळी लवकर नारळ पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा मर्यादित प्रमाणात नारळाचे पाणी पिऊ शकता. नारळाच्या पाण्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही खूप कमी असते, ज्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरलेले वाटते. परिणामी, तुम्ही अनावश्यकपणे पुन्हा पुन्हा खाणे टाळता. 

वजन कमी करण्याच्या दृष्टीने जेवढं वर्कआउट आवश्यक आहे. तेवढीच आहाराची काळजी घेणे सुद्धा गरजेचं आहे. जेवण करण्यापूर्वी नारळ पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. जेवण्यापूर्वी नारळपाणी प्यायल्यास अति खाणे टाळता येते. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया बरोबर राहते, तसेच अन्न खाल्ल्यानंतर फुगणे (आंबट ढेकर येणे) यापासूनही सुटका मिळते.