Diabetes : गोड खाल्यामुळे नाही तर, 'या' कारणांनी वाढतो मधुमेहचा धोका!

Health Tips : देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारात मधुमेह रुग्णांनी आपल्या रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. कार्बोहायड्रेटयुक्त आणि गोड पदार्थ तुमची साखर वाढवू शकतात. परंतु केवळ या गोष्टीच नाही तर जास्त ताण घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरची पातळी वाढू शकते.

Updated: Mar 25, 2023, 03:55 PM IST
Diabetes : गोड खाल्यामुळे नाही तर, 'या' कारणांनी वाढतो मधुमेहचा धोका!  title=
Health Tips Stress can increase the risk of diabetes

Health Tips : देशात मधुमेहाचा (Diabetes) प्रसार झपाट्याने होत आहे. भयावह बाब म्हणजे केवळ प्रौढच नाही तर तरुण आणि लहान मुलेही याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. मधुमेहामध्ये तुमचे शरीर आवश्यक इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा जेवढे इन्सुलिन तयार होते, ते शरीर योग्यरित्या वापरण्यास सक्षम नसते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. इन्सुलिन हा एक संप्रेरक आहे जो अन्नातून साखर शरीराच्या पेशींमध्ये वाहून नेतो. तर दुसरीकडे तणावाचे कारण मानसिक असू शकते, परंतु त्याच्या व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. 

मधुमेहाचा 'या' अवयवांवर परिणाम होतो

इन्सुलिनच्या अपुऱ्या उत्पादनामुळे रक्तात साखर राहते. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. मधुमेहाचा हळूहळू शरीराच्या इतर भागांवर परिणाम होऊ लागतो. मधुमेहामुळे तुमचे डोळे, किडनी, यकृत, हृदय आणि पाय यांच्याही समस्या आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, खराब जीवनशैली आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे बहुतांश लोक टाइप 2 मधुमेहाचे बळी ठरत आहेत. पण तणाव आणि दबाव देखील तुमच्या रक्तातील साखर वाढवू शकतो? तणाव आणि चिंता यांचा तुमच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीवर परिणाम होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तणाव किती धोकादायक असू शकतो

तणावाखाली, कधी कधी जास्त भूक लागते किंवा कधी कमी भूक लागते. आहार आणि जीवनशैलीचा हा असमतोल मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणत्याही प्रकारे चांगला नाही. रक्तातील साखर वाढण्यामागे मानसिक तणाव हे प्रमुख कारण असल्याचे बहुतांश तज्ज्ञांचे मत आहे. पण विज्ञान काय म्हणते? हे केवळ मूल्यांकन आहे की त्यामागे काही वैज्ञानिक आधार आहे.

ताण आणि मधुमेहावर डब्ल्यूएचओचे मत

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, तणावाची व्याख्या एखाद्या कठीण परिस्थितीमुळे होणारी चिंता किंवा मानसिक दबाव अशी केली जाऊ शकते. ताण हा एक नैसर्गिक मानवी प्रतिसाद आहे जो आपल्याला आपल्या जीवनातील आव्हाने आणि धमक्यांना सामोरे जाण्यास प्रवृत्त करतो. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या वेळी तणाव अनुभवतो. तथापि, आपण ज्या पद्धतीने तणावाला प्रतिसाद देतो त्याचा आपल्या एकूण आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. तणाव कधी जास्त तर कधी कमी असू शकतो, यामागे अनेक कारणे असू शकतात. ऑफिसमध्ये टार्गेट पूर्ण न होण्यापासून ते आर्थिक नुकसान, खराब आरोग्य, नोकरी किंवा कौटुंबिक समस्या, तणावाची असंख्य कारणे असू शकतात.

तणावामुळे मधुमेह होऊ शकतो

तणावामुळे कॉर्टिसोल आणि एड्रेनालाईन सारख्या तणाव संप्रेरकांची पातळी वाढते ज्यामुळे तुमच्या शरीरात इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते. इंसुलिन हा आपल्या शरीरात तयार होणारा हार्मोन आहे जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जेव्हा ते शरीरात योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा शरीरात साखर वाढू लागते.

मधुमेहामुळे ताण येतो का?

तज्ज्ञ सांगतात की, एखाद्याला डायबिटीज आहे असं कळलं तर त्याची पहिली प्रतिक्रिया अशी होते की मला का झालं?, रिपोर्ट चुकीचा आहे, लोक डॉक्टरांना सांगतात की मी यातून बरा होईन, औषध घेणार नाही, कारण मधुमेहाचा आजार तुम्हाला आयुष्यभर काही बंधनात बांधून ठेवतो आणि आता जगण्याची मजा हिरावून घेतली आहे असे अनेकांना वाटते. खरं तर, या आजारात, लोक फक्त ते काय खात आहेत आणि ते कसे जगत आहेत याची काळजी घ्यावी लागते. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या 20 टक्के लोक तणावाचे बळी आहेत. तुम्ही ते स्वीकारणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मधुमेहाने ग्रस्त असलेले बहुतेक लोक सामान्य माणसांसारखे आयुष्य जगतात.

तणावावर मात कशी करावी

प्रत्येकाकडे तणावावर मात करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. उद्यान, बाग किंवा कोणत्याही हिरव्यागार जागेत फेरफटका मारल्याने तुमचे मन शांत होईल आणि तणाव दूर होईल. नृत्य हा एक उत्तम व्यायाम आहे जो तणाव दूर करतो. योग करा, प्राणायाम करा, ध्यान करा, संगीत ऐका, पुस्तके वाचा, चित्रपट पहा, मित्रांशी बोला, कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवा. कॅफिन, अल्कोहोल, धूम्रपान मर्यादित करा. पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.