'KBC' मध्ये सगळ्यांसमोर स्पर्धक महिलेने काढली शाहरुख खानची इज्जत

हा शो 2007 साली प्रदर्शित झाला होता. 

Updated: Aug 7, 2022, 08:53 PM IST
'KBC' मध्ये सगळ्यांसमोर स्पर्धक महिलेने काढली शाहरुख खानची इज्जत title=

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. 22 जानेवारी 2007 रोजी सुरू झालेला KBC चा तिसरा सीझन अमिताभ बच्चन यांनी होस्ट केला नव्हता तर शाहरुख खानने होस्ट केला होता आणि लोकांनी त्याला स्वीकारलं नाही. शाहरुखनं ज्या प्रकारे सुत्रसंचालन केले ते प्रेक्षकांना आवडले नाही. या शोमुळे शाहरुख खानलाही नॅशनल टीव्हीवर एका महिलेकडून अपमानाला सामोरे जावे लागले होते.

दिल्लीच्या लेक्चरर अर्चना शर्मा या शोमध्ये स्पर्धक म्हणून पोहोचल्या होत्या. त्यांनी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंड जिंकला आणि 2 कोटी रुपये जिंकण्याच्या इराद्याने हॉट सीटवर पोहोचल्या. अर्चना या शाहरुखच्या चाहत्या नव्हत्या. अर्चना हॉट सीटवर पोहोचल्या आणि म्हणाल्या, 'मी तुझे चित्रपट पाहिले आहेत, पण सुरुवातीला मला वाटलं नाही की तू चांगला अभिनेता आहेस.' यावर शाहरुखला हसू अनावर झालं. 

पुढे अर्चना म्हणाल्या, 'जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असशील तर तू पण ही गोष्ट मान्य करशील की तू शम्मी कपूरसारखा आहेस.' शाहरुखच्या डोळ्यांटे कौतुक करत त्या शाहरुखला म्हणाल्या, तुझे डोळे सुंदर आहेत. अर्चना पुढे जाऊन एका प्रश्नावर अडून होत्या तर त्यावेळी शाहरुख त्यांना म्हणाला, त्यासाठी तुम्हाला शाहरुख मला मिठी मार असं म्हणावं लागेल. 

बराच विचार केल्यानंतर अर्चना यांनी शो सोडण्याचा निर्णय घेत म्हणाल्या, 'ओके मिस्टर खान, मला या मंचावर येऊन कोणत्याही अडचणीत अडकायचं नाही. मला शोमध्ये तुला मिठी मारायला आवडणार नाही, मी शो सोडते.'

अर्चना यांच बोलणं ऐकून शाहरुखचा चेहरा उतरला. त्यावर स्पष्टीकरण देत तो म्हणाला, 'माझ्या डोळ्यात अश्रू येतील. मला तुम्हाला मिठी मारायचे कारण म्हणजे तुम्ही खूप छान खेळलात. ते प्रेम मी तुमच्याकडून घेऊ शकेन. तुमचा आशीर्वाद मला मिळेल. 
 
हा एकमेव सीझन होता,ज्यामध्ये कोणीही करोडपती होऊ शकलं नाही. हा सीझन इतका फ्लॉप झाला की स्टार प्लसने तो पुढे नेला नाही,नंतर सोनी टीव्हीने हक्क विकत घेतले आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी चौथ्या सिझनमधून असे पुनरागमन केले की मागे वळून पाहिलेच नाही.