जयाच्या डिनरपार्टीमुळे रेखाच्या आयुष्यात खळबळ उडाली आणि रेखाचे अमिताभबरोबरचे संबंध कायमचे तुटले

जया बच्चन यांनी एक खास गोष्ट सांगितली जे ऐकुन रेखाच्या पायाखालची जमीन सरकली

Updated: Mar 26, 2021, 09:06 PM IST
जयाच्या डिनरपार्टीमुळे रेखाच्या आयुष्यात खळबळ उडाली आणि रेखाचे अमिताभबरोबरचे संबंध कायमचे तुटले title=

मुंबई : जेव्हा जेव्हा हिंदी बॉलिवूडमधील लव्हस्टोरीबद्दल बोललं जातं. तेव्हा-तेव्हा अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं नाव सगळ्यात पहिलं समोर येतं. या दोघांनी 'मिस्टर नटवरलाल', 'सिलसिला', 'दो अंजाने', 'नमक हराम', 'मुकद्दार का सिकंदर' या सिनेमध्ये एकत्र काम केलं आहे. एक काळ असा होता की वर्तमानपत्रात नव्हे, तर मासिकपत्रामध्ये या दोघांविषयी बातम्या छापल्या जायच्या. पण रेखा आणि अमिताभ हे दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीच काहीच बोलले नाही.

रेखासोबत अमिताभचा यांचा संबंध जया बच्चन यांच्या लग्नानंतर जोडला जावू लागला. १९७३ मध्ये जया बच्चनसोबत लग्नानंतर काही वर्षांनीच रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या.

अमिताभ आणि रेखाच्या अफेअरची बातम्या ऐकुन जया त्या दिवसांत खूपच नरवस झाल्या होत्या. आपल्या कुटुंबातील लोकांचं हसत-खेळत आयुष्य टिकून रहावं अशी त्यांची इच्छा होती तर दुसरीकडे विवाहित पुरुषावर प्रेम केल्यामुळे रेखा खलनायक बनली होती. मग एका रात्री असं काहीतरी घडलं ज्यामुळे रेखा अमिताभच्या आयुष्यापासून कायमची दूर गेली.

यानंतर एक दिवशी जेव्हा अमिताभ शूटिंगच्या निमीत्ताने मुंबईच्या बाहेर गेले होते. त्या दिवशी जया यांनी रेखाला कॉल केला. जयाचा फोन उचलताना रेखाच्या मनात अनेक विचार येत होते.  रेखाला वाटलं की, जया आपल्याला चांगल-वाईट सुनवेल. पण तसं काहिच झालं नाही. जयाने रेखाला तिच्या घरी जेवायला बोलावलं. यानंतर रेखा विचारात पडली, तिच्यासोबत असं काही होत होतं याची रेखाला कल्पना देखील न्हवती.

रेखा जेव्हा जयाच्या घरी जेवण्यासाठी पोहोचली तेव्हा जयाने तिच स्वागत केलं. जयाने रेखासोबत बऱ्याच गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये अमिताभचा यांचा कुठेच उल्लेख नव्हता. जेवणानंतर, रेखा जेव्हा घरी परतत होती, तेव्हा जया तिला एक खास गोष्ट म्हणाली जे ऐकुन रेखाच्या पायाखालची जमीन सरकली. जाता जाता जया रेखाला म्हणाली, 'काही झालं तरी मी अमिताभला कधीच सोडणार नाही'

दुसर्‍याच दिवशी जया आणि रेखाच्या डिनरपार्टीनंतर माध्यमांतून मोठ्या प्रमाणात बातम्या येवू लागल्या. पण या दोघांनी यावर मौन सोडलं. रेखाबद्दल अमिताभ आणि जया यांच्यात असं काहीतरी घडलं ज्यामुळे अमिताभ रेखासोबत कधीच काम करणार नाही असा निर्णय त्यांनी घेतला . 'सिलसिला' हा अमिताभ आणि रेखाचा एकत्र शेवटचा सिनेमा होता. या दोघांमधील अंतर इतकं वाढलं की, खऱ्या आयुष्यात जरी ते एकमेकांसमोर आले तरी नजर चूकवुन एकमेकांसमोरुन निघून जातात. मात्र हे आजही दोघे मनाने  एकमेकांचा खूप आदर करतात