'या' अभिनेत्यानं चार वेळा केलं लग्न! एक पळून गेली तर दुसरीला आईनं फेकून मारली चप्पल

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या चित्रपटांपैकी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी या चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. दरम्यान, एक अभिनेता असा आहे ज्यानं चार वेळा लग्न केलं आहे. 

Updated: Feb 13, 2023, 01:54 PM IST
'या' अभिनेत्यानं चार वेळा केलं लग्न! एक पळून गेली तर दुसरीला आईनं फेकून मारली चप्पल title=

Vinod Mehra Married Four Times : बॉलिवूड कलाकार हे फक्त त्यांच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. आज आपण एका अशा अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत जो उत्कृष्ट चित्रपटांसोबतच त्यांच्या चार लग्नांमुळेही चर्चेत होता. तर त्या अभिनेत्याचे नाव विनोद मेहरा असे आहे. विनोद मेहरा (Vinod Mehra) हे यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 70 च्या दशकात अप्रतिम चित्रपट दिली. आज विनोद आपल्यासोबत नसले तरी देखील त्यांच्या आयुष्यासंबंधीत गोष्टी नेहमीच चर्चेत राहतात. आज विनोद मेहरा यांचा वाढदिवस आहे. विनोद मेहरा यांचे पहिले लग्न मीना ब्रोका यांच्यासोबत झाले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि लवकरच दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर विनोद मेहरा यांच्या आयुष्यात एका व्यक्तीची एन्ट्री झाली होती. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनोद मेहरा यांनी अभिनेत्री बिंदिया गोस्वामीसोबत दुसरे लग्न केले होते. मात्र, जेव्हा विनोद मेहराचा वाईट काळ आला तेव्हा बिंदिया यांनी विनोद यांना सोडले. बिंदिया गोस्वामी घरातून पळून गेल्या आणि जे.पी. दत्ता यांच्यासोबत राहू लागल्या. या सगळ्या घटनेचा विनोद मेहरा यांच्यावर प्रचंड परिणाम झाला. मात्र, बिंदिया यांच्यानंतर विनोद यांच्या आयुष्यात अभिनेत्री रेखा (Rekha) यांनी एन्ट्री केली. 

हेही वाचा : पहिला पती मद्यपान करत मारायचा, दुसऱ्याचे लेकीसोबत गैरवर्तन आणि...; असं होतं Shweta Tiwari चं वैवाहिक आयुष्य

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनोद मेहरा आणि रेखा यांचे लग्न झाले. लग्नानंतर विनोद रेखा यांना त्यांच्यां घरी घेऊन गेले, तर रेखाला पाहताच त्यांच्या आईनं हातात चप्पल घेतली. असे म्हटले जाते की विनोद यांच्या आईला रेखा पसंत नव्हत्या. विनोद मेहरा यांचे हे लग्न देखील फार काळ टिकले नाही आणि ते दोघे विभत्त झाले. तर विनोद मेहरा यांनी वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले.  

खा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी विवाह केला होता. परंतु अवघ्या एका दिवसांत त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मुकेश अग्रवाल यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्यानंतर रेखा यांनी दुसरा विवाह केला नाही. त्यामुळे रेखा यांना मातृत्त्वाचं सुख कधी मिळूच शकलं नाही.