Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : आखरी बार तुमने सच कब बोला था ? म्हणतं शैलेश लोढाचा निर्मात्यांनाच सवाल?

शैलेश लोढा यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Updated: Sep 15, 2022, 06:05 PM IST
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : आखरी बार तुमने सच कब बोला था ? म्हणतं शैलेश लोढाचा निर्मात्यांनाच सवाल?  title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अलीकडेच तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता शैलेश लोढानं (Shailesh Lodha) मालिकेतून काढता पाय घेतला आहे. तेव्हापासून निर्माते नवीन तारक मेहताच्या शोधात होते. 

आणखी वाचा : Akshara Singh चा MMS Video लीक? सोशल मीडियावर व्हिडीओ लिंक व्हायरल

आता त्यांचा शोध संपला असून नवीन तारक मेहता भेटला आहे. तारक मेहताची भूमिका आता शैलेश लोढा नाही तर सचिन श्रॉफ साकारणार आहे. पण सचिन श्रॉफला पाहून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे काही लोकांनी नवीन एपिसोड त्यांच्या पसंतीस उतरला नाही असे देखील सांगितले. तर काही नेटकऱ्यांनी शैलेश लोढा यांना परत आणण्याची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणावर शैलेश लोढा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. 

आणखी वाचा :  Alia Bhatt ला दिलेल्या वागणुकीमुळे रणबीर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, नेटकरी म्हणाले...

शैलेश लोढानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं स्वत: चा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत 
एक ताजा व्यंग्य कविता
मेरा ही चेहरा सब से बड़ा हो
यार तुम कितने असुरक्षित और डरे हो
परिभाषा तक नहीं जानते ईमान की
इतनी बार अपना कहा बदलते हो
कीमत तो पता ही नहीं ज़ुबान की
अगर तुम में आत्मा होती तो पूछता
क्या कभी उसे टटोला था
वैसे एक सवाल ज़रूर है
आख़री बार तुमने सच कब बोला था ?

आणखी वाचा : लग्नाआधीच बदललं ऋतिकच्या Girlfriend चं नाव? किस्सा एकदम ओके!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'त्या' तीन सेकंदांनी बदललं ऐश्वर्या रायचं आयुष्य, एकदा तुम्हीही पाहा कुठे नशीब फळफळलं 
शैलेश यांनी शेअर केलेल्या या कवीतेवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'तारक मेहता मालिकेत परत या सर.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मी जेव्हा तुमची कवीता वाचतचो तेव्हा तुम्ही असीत मोदींवर निशाणा साधता असे वाटते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'सर आता तरी मालिका सोडण्याचं कारण सांगा.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'तुम्ही मालिकेत नाही म्हणून बघायला मज्जा येत नाही.' 

आणखी वाचा : मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा 'तो' Topless फोटो पुन्हा व्हायरल!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शैलेश लोढा हे त्यांच्या करारानं खूश नव्हता, त्याला वाटू लागले की त्यांचा वेळ आणि तारखा या योग्य प्रकारे वापरल्या जात नाही. शैलेशनं शो सोडण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे त्याला दुसऱ्या भूमिका करता येत नव्हत्या. गेल्या वर्षी त्यानं अनेक मोठ्या मोठ्या ऑफर्स नाकारल्या होत्या.