सलमान खान होता अभिषेक आणि ऐश्वर्या रायचा प्रेमदूत? जुना व्हिडीओ होतोय Viral

Salman Khan united Abhishek Bachchan and Aishwarya Rai : खरंच, सलमान खान झाला होता अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात प्रेमदूत

दिक्षा पाटील | Updated: Feb 5, 2024, 12:56 PM IST
सलमान खान होता अभिषेक आणि ऐश्वर्या रायचा प्रेमदूत? जुना व्हिडीओ होतोय Viral title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan united Abhishek Bachchan and Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी एकेकाळी सगळ्यांची आवडती होती. त्या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपमध्ये खूप स्ट्रगल केलं. 2000 मध्ये त्यांच्या रिलेशनशिपमध्ये खूप मोठा बदल झाला. त्यांची जोडी प्रेक्षकांमध्ये चर्चेत असली तरी त्यांच्या रिलेशनशिपला नावं मिळालं नाही. आज अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी लोकप्रिय सेलिब्रिटी कपल्सपैकी एक आहे. आज 5 फेब्रुवारी अभिषेक बच्चनचा वाढदिवस आहे. त्यात अभिषेक, ऐश्वर्या आणि सलमानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. 

अभिषेक, ऐश्वर्या आणि सलमानचा हा व्हायरल होत असलेला व्हिडीओत 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटातील आहे. या व्हिडीओ आपण पाहू शकतो की सलमान एक ट्रक चालवतोय आणि अभिषेक त्याच्या शेजारी बसला आहे. तर ट्रक चालवत असताना सलमान गाणं गुणगुणत आहे. तर यावेळी सलमान खान हा 'हमसे पूछो तन्हा रहना कैसा लगता है...' हे गाणं गुणगुणतोय. दुसरीकडे अभिषेकला रस्त्यावर ऐश्वर्या तिथे असल्याचा भास होतो. तो टॅकमधून वळून पाहतो. हे पाहता सलमान बोलता 'काय झालं..., स्वप्न पाहिलंस.' त्यानंतर पुन्हा सलमान गाणं गुणगुणतो नंतर अभिषेकला सांगतो की 'मित्रा, तुझं ठिकाणं आलं. ऑल द बेस्ट.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात ऐश्वर्या आणि अभिषेत यांची महत्त्वाची भूमिका होती. तर सलमान खानचा पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. 

दरम्यान, हा फार जुना व्हिडीओ आहे, तर सलमान खानच्या अनेक चाहत्यांनी हा व्हिडीओ पहिल्यांदा पाहिला आहे. काही लोकांनी म्हटलं की या व्हिडीओत सत्य पाहायला मिळतंय. तर काही नेटकऱ्यांनी सलमानची खिल्ली उडवत म्हटलं की सलमानला रस्त्यावर गाडी चालवत असताना पाहून व्यवस्थित स्टीयरिंग फिरवताना पाहून थोडं विचित्र वाटतंय. तिसरा नेटकरी म्हणाला की, हे एक परफेक्ट मीम मटेरियल आहे. 

हेही वाचा : कधी कपडे घेण्यासाठी नव्हते पैसे, आज 208 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'हा' मुलगा; मिस वर्ल्ड आहे त्याची पत्नी

अभिषेक ऐश्वर्याच्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाच्या वेळी त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुछ ना कहो’ या चित्रपटात त्यांनी पुन्हा एकदा काम केलं. मग 2006 मध्ये ‘उमराव जान’ ते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले. मग ‘धूम 2’ आणि त्यानंतर त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली. अखेर 20 एप्रिल 2007 रोजी त्यांनी सप्तपदी घेतल्या.