ऐश्वर्यासाठी Salman Khan रक्त बंबाळ, जीव संपवण्याचा घेतला निर्णय?

या दोघांची प्रेमकहाणी पूर्ण झाली नसेल पण आजही...

Updated: Dec 27, 2021, 01:26 PM IST
ऐश्वर्यासाठी Salman Khan रक्त बंबाळ, जीव संपवण्याचा घेतला निर्णय? title=

मुंबई : आज सलमान खानचा वाढदिवस आहे. सलमान सध्या त्याच्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करत आहे.  नुकतीच त्याला साप चावल्याची बातमी समोर आली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र आता सलमानची प्रकृती अगदी ठिक आहे. त्याने कॅमेरासमोर येत याबाबत माहिती देखील दिली आहे. 

सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त त्याची लव्ह लाईफ देखील चर्चेत असते. त्याच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटना या चर्चेत असतात. त्यातील एक म्हणून सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणी...

Salman Khan

या दोघांची प्रेमकहाणी पूर्ण झाली नसेल पण आजही चाहते त्यांच्या प्रेमाची चर्चा करताना थकत नाहीत. सलमान आणि ऐश्वर्याचे नाते 1997 मध्ये सुरु झाले. त्यादरम्यान ऐश्वर्याची बॉलिवूडमध्ये नवीन एन्ट्री झाली होती.

'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील दोघांच्या दमदार केमिस्ट्रीपासून ते विभक्त होण्याच्या वादापर्यंत त्यांचे नाते एक कोडेच राहिले. सलमानमुळे ऐश्वर्याला 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट मिळाल्याचे बोलले जाते.

संजय लीला भन्साळी हे सलमानचे जवळचे मित्र होते आणि त्यांच्या सांगण्यावरून ऐश्वर्याला एका बिग बजेट चित्रपटासाठी साईन करण्यात आले. येथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. ऐश्वर्याच्या पालकांना सलमान आणि ऐश्वर्याचे नाते अजिबात मान्य नव्हते.

Aishwarya Rai, salman khan

सलमान आणि ऐश्वर्याची जोडी एकेकाळी सर्वाधिक पसंतीची जोडी होती. पण कालांतराने दोघांच्या नात्यात अशी कटुता आली की आज दोघांना एकमेकांचे नाव घेणंही आवडत नाही.असे काय झाले की या क्षणी त्यांचे नाते संपुष्टात आले. असे म्हटले जाते की, एके दिवशी मध्यरात्री सलमान ऐश्वर्याच्या घरी पोहोचला आणि तिचा दरवाजा जोरात वाजवू लागला. 

Salman Khan and Aishwarya Rai Bachchan

दरवाजा वाजवत असताना सलमानच्या हातातून रक्त येऊ लागले. रागाच्या भरात सलमानने 19 व्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी दिली.सलमानच्या या गदारोळाचे कारण सांगितले जात आहे की, त्याला ऐश्वर्यासोबत लग्न करायचे होते पण ऐश्वर्याला त्यावेळी लग्न करायचे नव्हते.

2002 मध्ये ऐश्वर्याने सलमानवर मारहाणीचा आरोप केला तेव्हा नात्याचा पायाच डळमळीत झाला होता. ब्रेकअपनंतरही सलमानने ऐश्वर्याची साथ सोडली नाही. असं ही बोललं जातं.