Raveena Tandon : अक्षय कुमारशी तुटला साखरपुडा...; इतक्या वर्षांनंतर रवीनाला का आठवल्या त्या कटू आठवणी?

Raveena Tandon-Akshay Kumar : अक्षय कुमार आणि रवीना टंडन हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि साखरपुडाही केला होता. पण या दोघांचे लग्न होण्याच पूर्वीच त्याचे ब्रेकअप झाले. 

Updated: Feb 8, 2023, 01:11 PM IST
Raveena Tandon : अक्षय कुमारशी तुटला साखरपुडा...; इतक्या वर्षांनंतर रवीनाला का आठवल्या त्या कटू आठवणी? title=
Actor Raveena Tandon on her relationship with Akshay Kumar

Raveena Tandon-Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेचा विषय ठरतो. अक्षयनं जेव्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. त्यामधली एक म्हणजे 90 च्या दशकातील रवीना टंडन (Raveena Tandon) . रवीना आणि अक्षयच्या रिलेशनशिपच्या चर्चा तर आजही जोरात सुरु आहेत. (Akshay Kumar and Raveena Tandon Relationship).  'मोहरा' (Mohra) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ( Actor Raveena Tandon on her relationship with Akshay Kumar )

1994 मधील मोहरा सिनेमाच्या शुटींगनंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. दोघांची ऑनस्क्रिन जोडी इतकी हिट झाली होती की दोघांना एकत्र अनेक सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या.  'मोहरा', 'बारूद', 'खिलाडियो का खिलाडी', 'किमत 'सारख्या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं. अक्षय आणि रवीना (Akshay Kumar and Raveena Tandon Relationship) एकमेकांबरोबर खूप फिरायचे. त्यानंतर त्यांनी गुपचूप साखरपुडा केला होता पण याची माहिती कोणालाही कळू दिली नव्हती. पण लग्नापूर्वीत त्यांचा साखरपुडा मोडला होता. आता जवळपास दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटल्यानंतर रवीनाने यावर मौन सोडलं आहे. 

वाचा: बॉलिवूडमधील बड्या निर्मात्याचं निधन, सलमान खानच्या यशात मोलाचा वाटा

एएनआयशी बोलताना रवीना म्हणाली, “इतकी वर्षे उलटली आहे, पण जेव्हा माझं नाव गुगलवर सर्च केलं जातं, तेव्हा त्याचं नावही येतं, “पण, जर मी त्याच्या आयुष्यातून निघून गेले होते, तर या सर्व गोष्टींना अर्थ उरत नाही. कारण मी आधीच दुसर्‍याला डेट करत होते आणि तोही दुसर्‍या कुणाला तरी डेट करत होता, मग मला वाईट का वाटेल?” त्यानंतर रवीना म्हणाली, “मोहराच्या काळात आम्ही एक हिट जोडी होतो आणि आताही, जेव्हा आम्ही सर्वजण एकमेकांना कुठेतरी भेटतो, आम्ही सर्व गप्पा मारतो आणि पुढे जातो”, असं तिने सांगितलं.  हल्ली तर कॉलेजमध्ये मुली दर आठवड्याला बॉयफ्रेंड बदलत असतात, पण तुटलेला साखरपुडा का अजूनही माझ्या डोक्यातून जात नाही? खरं तर प्रत्येकजण आयुष्यात पुढे जातो, लोकांचे घटस्फोट होतात, ते मूव्ह ऑन करतात, साखरपुडा तुटणं ही काय खूप मोठी गोष्ट आहे का?” असा प्रश्नही तिने केला.