अल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; पाहा ठरतोय चर्चेचा विषय

अल्लू  अर्जुन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 

Updated: Aug 12, 2022, 09:40 AM IST
अल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; पाहा ठरतोय चर्चेचा विषय title=

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता अल्लू अर्जुनन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनचे लाखो चाहते आहेत. अल्लू अर्जुननं पुन्हा एकदा असं काही काम केलं आहे की त्याच्या चाहत्यांना फार आनंद झाला आहे. अल्लू अर्जुननं दारूच्या जाहिरातीला नकार दिल्याचे म्हटले आहे. एका मोठ्या दारू कंपनीनं अल्लू अर्जुनला जाहिरातीसाठी कोटींची ऑफर दिली होती. मात्र, अल्लू अर्जुननं क्षणार्धात ही जाहिरात करण्यास नकार दिला. अल्लू अर्जुननं यापूर्वीही तंबाखूच्या जाहिराती नाकारल्या आहेत. चाहते त्याच्या या खेळाचे कौतुक करत आहेत, तर नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की तो खरा सुपरस्टार आहे.

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटानं बॉक्य ऑफिसवर कोटींच्या रुपयांचे कलेक्शन केले होते. तेव्हापासून त्याचे चाहते दुसऱ्या भागाची प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटाच्या यशानंतर अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेत वाढ झाली. त्यानंतर त्याला अनेक जाहिरातींच्या ऑफर मिळाल्या. पण अल्लू अर्जुननं आरोग्यास हानीकारक असलेल्या उत्पादनाची जाहिरात न करण्याचा निर्णय घेतला. रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनला या Whisky Brand कडून जाहिरातीसाठी 10 कोटी रुपयांची ऑफर मिळाल्याचे म्हटले आहे. 

आणखी वाचा : 90 वर्षांची परंपरा जपण्यासाठी इथं गावकरी कपडेच घालत नाहीत

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

आणखी वाचा : ब्रेकअपनंतर Depression येतंय? तर या 4 टिप्स करा फॉलो

नुकत्याच मिळालेल्या रिपोर्टनुसार, तंबाखू आणि गुटख्याच्या जाहिराती नाकारल्यानंतर आता अल्लू अर्जुनने दारूच्या ब्रँडची ऑफरही नाकारली आहे. यामागचे कारण म्हणजे, अल्लू अर्जुन स्वत:  तंबाखूचे सेवन करत नाही. यासगळ्या परिस्थितीत अल्लू अर्जुनची जाहिरात पाहून त्याचे चाहतेही तसंच करू लागतील. 

आणखी वाचा : अचानक प्रकृती बिघडल्यामुळं अभिनेत्री रातोरात रुग्णालयात दाखल; चेहऱ्याला सूज, आवाजही ओळखता येईना अशी अवस्था...

 

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे याआधीही हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार खूप वाईट प्रकारे अडकले आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. इतकंच नाही तर अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही पान मसाल्याच्या जाहिरातीवरून लोकांनी टीका केली होती. कामाच्या आघाडीवर, अभिनेता अल्लू अर्जुन लवकरच 'पुष्पा'च्या दुसऱ्या भागात दिसणार आहे.