तिनं फक्त पैशांसाठीच माझ्याशी लग्न केलं होतं, पतीने करिष्मावर गंभीर आरोप करताच....

लग्नाचं नातं प्रत्येकासाठी आव्हानात्मकच असतं. पण..

Updated: Sep 17, 2021, 11:59 AM IST
तिनं फक्त पैशांसाठीच माझ्याशी लग्न केलं होतं, पतीने करिष्मावर गंभीर आरोप करताच....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : लग्नाचं नातं प्रत्येकासाठी आव्हानात्मकच असतं. पण, या नातं दृढ करण्यासाठी वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. अनेकदा नेमकं हेच होत नाही आणि मग नातं तुटण्याच्या वळणावर येऊन थांबतं. बॉलिवूडमध्ये अशी अनेक नाती पाहायला मिळाली आहेत. अभिनेत्री करिष्मा कपूर आणि संजय कपूर यांचं नातं त्यापैकीच एक. 

सुरुवातीला करिष्मा आणि संजयच्या नात्यात सारंकाही सुरळीत होतं. या जोडीला दोन मुलंही झाली. समायरा आणि कियान अशी या मुलांची नावं. ज्यांच्या येण्यानं करिष्माचं कुटुंब पूर्ण झालं असं वाटत होतं. पण, लग्नानंतर 11 वर्षांनी नात्यांचं हे समीकरण चुकतंय असं वाटू लागलं. करिष्मा या नात्यासाठी जिथं सर्वस्व पणाला लावत होती, तिथेच संजयची वागणूक या नात्याला पोखरु लागाली होती. 

2012 पासूनच ही जोडी वेगळी राहू लागली होती. पण, यादरम्यानही संजयकडून करिष्मावर गंभीर आरोप लावले गेल्याचं म्हटलं जात होतं. त्यानं लावलेले आरोप इतके गंभीर होते, की त्यामुळं कुणा एकाचं आयुष्यही उध्वस्त होऊ शकतं. 

वांद्रे कौटुंबिय न्यायालयात संजय कपूरनं घटस्फोटासाठीची याचिका दाखल करत करिष्मावर काही गंभीर आरोप लावले होते. एक सून म्हणून तिनं आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नसल्याचं म्हणत करिष्मानं फक्त पैशांसाठीच आपल्याशी लग्न झाल्याचं सांगितलं. कसलाही विचार न करता तिनं माझ्या कुटुंबाची संपत्ती आणि पैशांचा वापर आपल्या चैनीच्या आवडींसाठी केला. लग्नापेक्षा अधिक महत्त्व तिनं चित्रपट कारकिर्दीला दिलं, असं संजयनं सांगितलं. 

संजयनं लावलेले आरोप पाहता करिष्मावर हा आघातच झाला होता. पण, तरीही या परिस्थितीतून ती सावरली आणि पुढे काय घडत गेलं हे सारं काळानुरुप चाहत्यांच्याही समोर आलं.