लग्नानंतर कायम जया यांच्यासोबत खोटं बोलायचे अमिताभ बच्चन

 अमिताभ बच्चन सध्या तुफान चर्चेत आहेत.   

Updated: Dec 17, 2021, 01:10 PM IST
लग्नानंतर कायम जया यांच्यासोबत खोटं  बोलायचे अमिताभ बच्चन title=

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' शो गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये शुक्रवारी मोठ्या सेलिब्रिटींची नांदी पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री नीना गुप्ता आणि गजराज राव शोमध्ये पाहुणे म्हणून दिसणार आहेत. 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर प्रश्न-उत्तरांचा तास तर रंगतोचं पण अनेक मुद्द्यांवर चर्चा देखील होते. यादरम्यान अनेक मोठे खुलासे समोर येतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडीओमध्ये निना गुप्ता, बिग बींना विचारतात, मी जे काही तुम्हाला विचारेल त्याचं तुम्ही खरं उत्तर द्याल. यावर बिग बी म्हणतात, 'ही तर माझी परीक्षा आहे...' अशा परिस्थितीत नीना गुप्ता बिग बींना विचारतात की, तुमची आतापर्यंतची सर्वात आव्हानात्मक भूमिका कोणती आहे?

नीना गुप्ता यांना उत्तर देताना अमिताभ बच्चन म्हणाले की, 'प्रत्येक सिनामा माझ्यासाठी आव्हान असतो.' यानंतर नीना गुप्ता यांनी अमिताभ यांनी विचारले, 'तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कधी खोटे बोलले आहे का?" त्याला प्रत्युत्तर देताना बिग बी म्हणाले की, 'मला रोजचं खोटं बोलावं लागलं आहे...' त्याचं उत्तर ऐकून गजराज राव टाळ्या वाजवून हसायला लागले.