'जम्मू-काश्मीर-लद्दाख आमचा आहे आणि आमचाच राहणार, भारताचं चीन-पाकला चोख प्रत्युत्तर

चीन आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीर मुद्द्यावर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. ज्याला भारताने कडाडून विरोध केलाय.

Updated: Feb 9, 2022, 10:38 PM IST
'जम्मू-काश्मीर-लद्दाख आमचा आहे आणि आमचाच राहणार, भारताचं चीन-पाकला चोख प्रत्युत्तर title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या भागांमध्ये प्रस्तावित असलेल्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) वर भारताने बुधवारी तीव्र आक्षेप घेतला. भारत सरकारने पाकिस्तान आणि चीनने जारी केलेले संयुक्त निवेदनही फेटाळले आहे, ज्यात काश्मीरचा संदर्भ आहे.

चीन-पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या प्रकरणाबाबत म्हटले आहे की, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील संयुक्त निवेदनात 6 फेब्रुवारी 2022 रोजी जम्मू-काश्मीर आणि तथाकथित चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा उल्लेख करण्यात आला आहे. आम्ही नेहमीच असे संदर्भ नाकारले आहेत आणि आमची भूमिका चीन आणि पाकिस्तानला माहीत आहे. येथेही आम्ही संयुक्त निवेदनातील जम्मू-काश्मीरचा संदर्भ नाकारतो.

जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य भाग

बागची यांनी बुधवारी सांगितले की, चीन आणि पाकिस्तानने 6 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात जम्मू-काश्मीर आणि तथाकथित चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) संदर्भात केलेल्या उल्लेखाची आम्ही दखल घेतली आहे. मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग होते, आहेत आणि नेहमीच राहतील.

भारताच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्याची गरज नाही

ते म्हणाले, "आम्ही आशा करतो की संबंधित पक्ष भारताच्या अंतर्गत समस्यांमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत." CPEC बद्दल बोलत असताना, आम्ही त्या प्रकल्पांबाबत आमच्या चिंता चीन आणि पाकिस्तानला सतत सांगत आहोत. जे भारताच्या हद्दीत आहेत आणि ज्यावर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे.

पाकिस्तानच्या या प्रयत्नाला विरोध

बागची पुढे म्हणाले की, पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्याखाली असलेल्या भागात स्थिती बदलण्याच्या इतर देशांसह पाकिस्तानच्या कोणत्याही प्रयत्नांना आमचा तीव्र विरोध आहे. आम्ही संबंधित पक्षांना असे प्रकार थांबवण्याचे आवाहन करतो.

काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तान आणि चीनमधील जुगलबंदी पुन्हा एकदा समोर आली आहे. एका संयुक्त निवेदनात चीनने पुन्हा काश्मीर प्रश्नावर योग्य आणि शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे आणि परिस्थिती गुंतागुंती करणाऱ्या एकतर्फी कारवाईला विरोध केला आहे. भारताचा कडाडून विरोध असूनही दोन्ही देश यावर सतत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात.

संयुक्त निवेदनानुसार, पाकिस्तानने चीनच्या बाजूने जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरील ताज्या घडामोडींची माहिती दिली. चिनी बाजूने पुनरुच्चार केला की काश्मीर प्रश्न हा भूतकाळातील वाद आहे आणि तो योग्य आणि शांततापूर्ण मार्गाने सोडवला गेला पाहिजे. चीन कोणत्याही एकतर्फी कारवाईला विरोध करतो ज्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होते.