uddhav thackrey

सामनातून 'हसोबा प्रसन्न' गायब?

वादग्रस्त व्यंगचित्रानंतर 'सामना'तून हसोबा प्रसन्न गायब झालाय. आजच्या सामनाच्या पुरवणीत हसोबा प्रसन्न हे श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्या व्यंगचित्राचे सदर प्रसिद्ध झालेल नाही.

Oct 2, 2016, 08:23 AM IST

शिवसैनिकांचा जशास तसं उत्तर देण्याचा इशारा

शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या नवी मुंबईतल्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक तर ठाण्यात कार्यालयात शाई फेकण्याचा प्रकार घडलाय. सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल छापलेल्या व्यंगचित्रावरून वाद निर्माण झालाय. त्याचं पर्यवसन सामनाच्या आस्थापनांवरील हल्ल्यात झालंय.

Sep 27, 2016, 04:59 PM IST

डॉ. दीपक सावंतांचं पद काढून घेण्याची शिवसैनिकांची मागणी

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे असणारे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काढून घेण्याची मागणी खुद्द जिल्ह्यातील शिवसैनिकांनीच केल्याने खळबळ माजली आहे. डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पालकमंत्रीपद दिल्यानंतर प्रशासन गतिमान होईल अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती; मात्र त्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात अधिकारीराज सुरू असल्याचे आरोप करीत त्यांना तातडीने हटवून शिवसेनेचाच दुसरा पालकमंत्री नियुक्त करण्याची मागणी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Aug 20, 2016, 10:38 AM IST

उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा

‘अब हिंदू मार नहीं खाएगा!’ ही गर्जना करणाऱ्यांचे राज्य देशात व जम्मू-कश्मीरातही आहे, पण हिंदू संकटातच आहे, अशा शब्दात पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

Jul 24, 2016, 10:20 AM IST

उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र

उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार असतानाही हिंदूंवर संकट येत आहेत. काश्मीर आणि अमरनाथ येथे हिंदुवर संकटं आहेत. याकडे सरकारचं लक्ष का नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय.

Jul 11, 2016, 02:50 PM IST

मंत्रिपदासाठी शिवसेनेमध्ये जोरदार लॉबिंग

शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. शिवसेनेच्या वाट्याला त्यांची 2 राज्यमंत्रीपदं आहे. या मंत्रीपदावर आपली वर्णी लागावी यासाठी शिवसेना आमदारांकडून जबरदस्त स्पर्धा सुरु आहे. 

Jul 7, 2016, 04:55 PM IST

शिवसेनेचा आज 50 वा वर्धापन दिन

आज शिवसेनेचा 50 वा वर्धापन दिन आहे. आजच्या दिवशी शिवसेना या पक्षाची स्थापना करण्यात आली होती.

Jun 19, 2016, 08:42 AM IST

'शिवसेनेच्या शिवजलक्रांतीमुळे गावात पाणी'

मान्सूनपूर्व पावसानं मराठवाड्यातली जनता आनंदली असली, तरी त्यावरून सत्ताधारी युतीमध्ये मात्र चढाओढ सुरू झालीय. आधी दुष्काळ उपाय योजनांवरून सरकारवर टीका करणारे उद्धव ठाकरे आता शिव जलक्रांतीच्या कामांमुळेच हे पाणी दिसत असल्याचं म्हटलंय. 

Jun 14, 2016, 04:12 PM IST