brebourne stadium

भारताची पुन्हा हाराकिरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६ धावांनी पराभव

ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ३६ धावांनी पराभव झालाय. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला या सामन्यात केवळ ५ विकेट गमावताना १५० धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या. यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर मूनीने ७१ धावांची जबरदस्त खेळी केली. तर एलिस विलानीने ६१ धावा कुटल्या.

Mar 26, 2018, 02:05 PM IST