रंगलं युद्ध

युपीत भाजपच्या यशानंतर बिहारमध्ये रंगलं युद्ध

उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयानंतर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरप्रदेशातील विजयावर अनेकांच्या भूवया उंचावल्या. पण याचा प्रभाव बिहारमध्ये देखील दिसू लागला आहे. बिहारमध्ये यावरुन आता वॉर सुरू झाला आहे. बिहारमध्ये यूपीतल्या विजयानंतर या दोन नेत्यामध्ये युद्ध रंगू लागलं आहे. आरजेडीचे अध्यक्ष लालू यादव आणि भाजपचे नेता सुशील मोदी यांच्यात वॉर सुरु झाला आहे. सुशील मोदींच्या ट्विटवर लालू यादव यांनी त्यांच्या अंदाजात उत्तर दिलं.

Mar 11, 2017, 01:26 PM IST