मुंबई गोवा महामार्ग

कोकणात धुव्वाधार, रेल्वे वाहतूक विस्कळीत

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. रत्नागिरीत खेड,चिपळूण, राजापूर आणि संगमेश्वर येथील नद्यांना पूर आलायं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

Jul 23, 2013, 04:21 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात ४ ठार

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. लक्झरी बस आणि ट्रकची समोरसमोर धडक होऊन ४ प्रवासी ठार तर १३ जण जखमी झालेत.

Jul 13, 2013, 10:20 AM IST

कोकणात पूरस्थिती, विद्यार्थी गेला वाहून

कोकणात जोरदार वृष्टी होत असल्याने अनेक नद्यांना पूर आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण, संगमेश्वर, राजापूर येथे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेय. तर पोलादपूर येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थी वाहून गेला.

Jul 3, 2013, 04:10 PM IST

कोकणात मुसळधार, रेल्वे-रस्ता वाहतुकीवर परिणाम

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. याचा परिणाम मुंबई-गोवा रस्ता वाहतूक आणि कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे दरड कोसळ्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी हेल्पलाईन सेवा सुरू केलेय.

Jul 3, 2013, 08:30 AM IST

खेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याच्या प्रस्तावाकडे राज्य तसेच केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेड येथे जगबुडी नदीत खासगी बस कोसळून ३७ ठार तर १५ जण जखमी झालेत. या अपघातानंतर सरकारला जाग आलेय. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाचा पाठपुराव करण्याचे आश्वासन सरकारला द्यावे लागले तर ट्रॉमा केअर सेंटरचा तातडीने विचार करण्याचे स्पष्ट करण्यात आलेय.

Mar 20, 2013, 01:53 PM IST

अपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे पहाटे खासगी बसला अपघात झाला. या अपघातात ३७ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. या महामार्गावरील अरूंद रस्त्यांमुळे अपघातांत वाढ होत आहे. हाच मुद्दा धरून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांची उचलून धरला.

Mar 19, 2013, 01:57 PM IST

बस नदीत कोसळली; ३७ जण ठार, १५ जखमी

प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस नदीत कोसळून भीषण दूर्घटना घडलीय. या अपघातात ३७ जण ठार झालेत तर १५ जण गंभीर जखमी आहेत.

Mar 19, 2013, 08:03 AM IST

बाप्पाचे स्वागत `खड्डेमय रस्त्यांनी`

कोकणात गणेशोत्सवाची धूम असते. मुंबई, पुण्यासह इतर भागात काम करणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी आवर्जुन घराकडे परतत असतो. मात्र दरवर्षी प्रमाणे यंदाही खड्डेमय रस्त्यांचा अडथळा पार करुनच कोकणवासीयांना बाप्पाच्या स्वागतासाठी जावं लागणार आहे.

Sep 17, 2012, 09:39 AM IST