भारताचा इशारा

दहशतवादी सोपवा तरच संबंध सुधारतील, भारताचा पाकला इशारा

परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा

Nov 16, 2019, 03:26 PM IST

भारताचा पाकिस्तानाला इशारा

 भारत सरकारने पाकिस्तानला इशारा दिला आहे. सीमेवर दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. दहशतवादी मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत आहे. यामुळे शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील होत आहे. जम्मू कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात एक भारतीय जवान शहीद झाला आहे.

Aug 10, 2017, 09:08 AM IST

शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा इशारा

सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तान एलओसीवर सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान जम्मू-कश्मीरच्या सीमाभागात सतत फायरिंग करत आहे. पाकिस्तानी सेना भारतीय जवानांना निशाना बनवत आहेत. गावातील भागांना देखील पाकिस्तान सैन्याकडून निशाना बनवण्यात येत आहे. भारताने आता पाकिस्तानला या विरोधात एक पत्र दिलं आहे.  2 आणि 9 नोव्हेंबरनंतर या महिन्यात तिसऱ्यांदा विरोध पत्र देण्यात आलं आहे. सीमापलिकडे पाकिस्तानच्या चौक्यांजवळ दहशतवादी देखील जमत असल्याचं भारताने नमूद करत त्याची निंदा केली आहे.

Nov 17, 2016, 10:58 PM IST

भारताचा सिंधूचं पाणी रोखून धरण्याचा पाकिस्तानला इशारा

उरीमध्ये लष्कराच्या कॅम्पवर हल्ला झाल्यानंतर भारताने सगळ्या बाजूने पाकिस्तानला घेरण्यास सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तान पुन्हा एकदा इशारा देत पाकिस्तानला संकटात आणलं आहे. गरज पडल्यास भारत हा सिंधू नदीचं पाणी अडवून धरु शकतो असा इशारा पाकिस्तानला देण्यात आला आहे.

Sep 22, 2016, 08:14 PM IST