भारताच्या विजयावर सचिनचे शानदार ट्विट; काही तासात १३ हजार लाईक्स

भारताने श्रीलंकेला एक डाव आणि १७१ धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली.

Updated: Aug 14, 2017, 08:54 PM IST
भारताच्या विजयावर सचिनचे शानदार ट्विट; काही तासात १३ हजार लाईक्स title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या फूल फॉर्मात आहे. भारतीय संघाने सोमवारी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत श्रीलंकेला धूळ चारली. भारताने श्रीलंकेला एक डाव आणि १७१ धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली. दरम्यान, भारतीय संघाचे हे यश पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने एक शानदार ट्विट केले. ज्याला अवघ्या तीन तासात सुमारे १३,००० पेक्षाही अधिक लोकांनी लाईक केले.

सचिन तेंडूलकरने ट्विट करत या शानदार वियजाबद्धल भारतीय संघाचे कौतूक केले आहे. तसेच, 'विराट' संघाच्या पूढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. सचिनच्या या ट्विटवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला. सचिनच्या या ट्विटला अवघ्या ३ तासात १३ हजारांहून अधिक लाईक्स तर मोठ्या प्रमाणात कमेंट्सही आल्या. 
दरम्यान,  देशाबाहेर खेळल्या जाणाऱ्या तीन साम्यांच्या मालिकेत एखाद्या संघाला पराभूत करण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, या विजयासोबत भारताने 2015 नंतर सलग 9 मालिका जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियासोबतच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या आधी 2005 ते 2008 पर्यंत ऑस्ट्रेलियाने सलग 9 मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता. भारत, ऑस्ट्रेलिया पाठोपाठ इंग्लंडचा क्रमांक लागतो. इग्लंडनेही सलग 8 मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे.