Rohit Sharma T20 Retirement: रोहित शर्मा टी-ट्वेंटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार? World Cup 2023 आधी केला मोठा गोप्यस्फोट!

Rohit Sharma Statement : रोहित शर्मा त्याचं वाढतं वय पाहता क्रिकेट जगतातून निवृत्ती (T20 Retirement) घेऊ शकतो, अशी देखील चर्चा होती. त्यावर आता त्याने स्वत: फुल स्टॉप लगावला आहे.

Updated: Aug 6, 2023, 08:46 PM IST
Rohit Sharma T20 Retirement: रोहित शर्मा टी-ट्वेंटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार? World Cup 2023 आधी केला मोठा गोप्यस्फोट! title=
Rohit Sharma T20 Retirement

Rohit Sharma On T20 Retirement: टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर रोहित शर्माचा (Rohit Sharma) फॉर्म गडगडला आहे. गेल्या काही लिमिटेड ओव्हर सामन्यात रोहित शर्माला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता रोहित शर्मा टी-ट्वेंटी क्रिकेटला (Rohit Sharma T20 Retirement) रामराम ठोकणार अशा चर्चांना उधान आलंय. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 36 वर्षांचा झालाय. त्यामुळे 2023 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर तो निवृत्ती जाहीर करू शकतो, असा अंदाज चाहत्यांनी बांधला जात असतानाच आता रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलंय.

नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?

तुम्हाला सर्वांना माहितीये की, येत्या काळात विश्वचषक येत आहे हे तुम्हाला माहीतच आहे. जूनमध्ये इथे (अमेरिकेत) वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे, मला खात्री आहे की प्रत्येकजण याबद्दल उत्सुक आहे. होय, आम्ही देखील त्याची वाट पाहत आहोत, असं म्हणत रोहित शर्माने आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup) खेळण्याचे संकेत दिले आहेत.

क्रिक किंगडम क्रिकेट अकादमी

वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर रोहित शर्मा अमेरिकेला रवाना झाला होता, जिथे त्यानं 5 ऑगस्ट रोजी स्वतःची 'क्रिक किंगडम' नावाची (Crick Kingdom Cricket Academy) क्रिकेट अकादमी सुरू केली आहे. त्यामुळे आता त्याने निवृत्तीची तयारीही सुरू केली आहे, अशी कुजबुज सुरू झाली होती. नुकतंच वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात रोहितने शतक झळकावलं होतं. तरी रोहित शर्मा त्याचं वाढतं वय पाहता क्रिकेट जगतातून निवृत्ती घेऊ शकतो, अशी देखील चर्चा होती. त्यावर आता त्याने स्वत: फुल स्टॉप लगावला आहे.

आणखी वाचा - लेकाच्या डेब्यूनंतर आई-वडिलांना अश्रू अनावर; तिलक वर्मा म्हणतो, 'रात्री 11 वाजता फोन केला अन्...'

दरम्यान, 2021 मध्ये टी-ट्वेंटी संघाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर रोहितने संघात मोठे बदल केले. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर बीसीसीआयने सुत्र हातात घेऊन हार्दिक पांड्याकडे टी-ट्वेंटी संघाचं नेतृत्व दिलं आहे.