श्रीलंकन बॅट्समन्सनी डाव सावरला

  भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात तिसरा कसोटी सामन्यात भारताची पकड मजबूत होत असताना श्रीलंकन बॅट्समन्सनेही आपला जम बसविला आहे.

Updated: Dec 4, 2017, 02:41 PM IST
 श्रीलंकन बॅट्समन्सनी डाव सावरला  title=

नवी दिल्ली :  भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात तिसरा कसोटी सामन्यात भारताची पकड मजबूत होत असताना श्रीलंकन बॅट्समन्सनेही आपला जम बसविला आहे.

पहिल्या डावात भारताच्या ५३६ धावा झाल्या आहेत.

महत्त्वाची भागीदारी 

श्रीलंकेचा दुसरा दिवस  १३१  धावा / ३ विकेट्स असा संपला होता. तिसरा दिवस श्रीलंकन बॅट्समन्सनी पिचवर पाय रोवला. मध्यांतरापर्यंत श्रीलंकेचे २७० वर ४ विकेट गेले.

मॅथ्यूज आणि चांदीमलने १८१ रन्सची महत्त्वाची भागीदारी केली.